सार्थ तुकाराम गाथा

भाग्याचा उदय – संत तुकाराम अभंग – 1505

भाग्याचा उदय – संत तुकाराम अभंग – 1505

भाग्याचा उदय । ते हे जोडी संतपाय ॥१॥
येथूनिया नुठो माथा । मरणांवाचूनि सर्वथा ॥ध्रु.॥
होई बळकट । माझ्या मना तूं रे धीट ॥२॥
तुका आला लोटांगणीं । भक्तीभाग्या जाली धणी ॥३॥

अर्थ

अर्थ:–माझ्या भाग्याचा उदय झाला आहे, माझे भाग्य फळाला आले आहे म्हणून मला आता संतांच्या पायांची सेवा करण्याचे भाग्य लाभले. आता त्यांच्या चरणांवर ठेवलेले माझे मस्तक शेवटपर्यंत तसेच राहो, मरणाआधी ते तिथून किंचित देखील हलू नये हीच काय ती आता माझी अपेक्षा, हेच काय ते आता देवाजवळ माझे मागणे आहे.तुकोबाराय आपल्या मनाला बजावतात की हे मना तू आता बळकट हो, धीट हो कारण भक्तिपंथावर चालणे वाटते तेवढे सोपे काम नाही, सरळ नाही म्हणून संतांच्या पायी आता मला लोटांगण घालू दे, त्यांचे मार्गदर्शन मला लाभू दे. तुकाराम महाराज म्हणतात भक्तिभाग्य लाभल्यामुळे म्हणजेच एवढा मोठा भाग्योदय झाल्यामुळे माझे मन आता शांत आणि समाधान पावले आहे.

वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *