सार्थ तुकाराम गाथा

खुंटोनियां दोरी आपणियांपाशीं – संत तुकाराम अभंग – 1591

खुंटोनियां दोरी आपणियांपाशीं – संत तुकाराम अभंग – 1591

खुंटोनियां दोरी आपणियांपाशीं । वावडी आकाशीं मोकलिली ॥१॥
आपुलिया आहे मालासी जतन । गाहाणाचे ते ॠण बुडों नेणें ॥ध्रु.॥
बीज नेलें तेथें येईल अंकुर । जतन तें सारे करायाची ॥२॥
तुका म्हणे माझी निंश्चितीची सेवा । वेगळें नाहीं देवा उरों दिलें ॥३॥

अर्थ

दोरी खुंटीला बांधली व वावडी आकाशात मोकळी जरी सोडून दिली तरी दोरीमुळे ती वावडी आपल्यापाशी परत येत असते. जो मालाचे रक्षण करतो त्याचा माल चोरी जात नाही त्याप्रमाणे जेवढे कर्ज दयायचे असेल त्याच किमतीची वस्तू गहाण ठेवून कर्ज दिले तर त्याचे पैसे बुडत नाही. शेतामध्ये बीज नेले ते पेरले तर अंकुर येणार परंतू त्याचे त्या अंकुराची फलप्राप्ती होण्याकरीता त्याचे जतन करणे हे मुख्य सार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुमची सेवा मी निश्चिंत मनाने करत आहे आणि त्या सेवेमुळेच मी तुम्हाला व मला वेगळे उरु दिले नाही.”


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *