सार्थ तुकाराम गाथा

ऐका गा हे अवघे जन – संत तुकाराम अभंग – 1599

ऐका गा हे अवघे जन – संत तुकाराम अभंग – 1599

ऐका गा हे अवघे जन । शुद्ध मन तें हित ॥१॥
अवघा काळ नव्हे जरी । समयावरी जाणावा ॥ध्रु.॥
नाहीं कोणी सवें येता । संचिता या वेगळा ॥२॥
बरवा अवकाश आहे । करा साहे इंद्रियें ॥३॥
कर्मभूमीऐसा ठाव । वेवसाव जाणावा ॥४॥
तुका म्हणे उत्तम जोडी । जाती घडी नरदेह ॥५॥

अर्थ

मी सर्व लोकांना हे सांगत आहे की आपले मन शुध्द करा यानेच आपले हित होणार आहे. प्रत्येक वेळी मन शुध्द करुन राहाता येत नसले तरी देखील वेळप्रसंगी सावधान राहावे. कारण तुमच्याबरोबर कोणीही येत नाही केवळ तुमचे संचित कर्मच तुमच्याबरोबर राहाते. काळाने आणखी तुमच्यावर झडप घातलेली नाही त्यामुळे तुम्हाला अजून बराच अवकाश आहे व या कारणामुळे तुमचे सर्व इंद्रिय परमार्थ मार्गाला लावा. ही कर्मभूमी अशी आहे आपण येथे जे प्रयत्न करु ते घडू शकते अशा महिमा या कर्मभूमीचा आहे त्यामुळे आपल्या हिताचा जो व्यवसाय आहे तो “परमार्थ” करावा. तुकाराम महाराज म्हणतात, “हा नरदेह आपल्याला प्राप्त झाला हा मोठा लाभ आहे त्यामुळे आपण या नरदेहाचा उपयोग परमार्थ करण्याकरता करावा कारण हा देह घडीघडीने वाया जात आहे याचा विचार करावा.”


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *