सार्थ तुकाराम गाथा

बळीवंत कर्म – संत तुकाराम अभंग – 1607

बळीवंत कर्म – संत तुकाराम अभंग – 1607

बळीवंत कर्म । करी आपुला तो धर्म ॥१॥
पुढें घालुनियां सत्ता । न्यावें पतना पतिता ॥ध्रु.॥
आचरणें खोटीं । केलीं सलताती पोटीं ॥२॥
तुका म्हणे देवा । नाहीं भजन केली सेवा ॥३॥

अर्थ

प्रारब्ध, कर्म हे फार बलवंत असतात त्यामुळे तेच शरीराला भोग घडवितात. प्रारब्ध कर्म पापी मनुष्याला पुढे घालून आणखी पतनाला नेत असतात. जे वाईट कर्मे केलेली असतात, जे वाईट आचरण केलेले असतात ते पोटात सलतात कारण त्यामुळे अनेक प्रकारचे दुःख भोगावे लागतात. तुकाराम महाराज म्हणतात देवा‌ ज्याणे तुझे भजन आणि सेवा केली नाही त्याच्याकडून तर नक्कीच पाप घडते असते.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *