सार्थ तुकाराम गाथा

मुक्तीपांग नाहीं विष्णुचिया दासां – संत तुकाराम अभंग – 1685

मुक्तीपांग नाहीं विष्णुचिया दासां – संत तुकाराम अभंग – 1685

मुक्तीपांग नाहीं विष्णुचिया दासां । संसार तो कैसा न देखती ॥१॥
बैसला गोविंद जडोनियां चित्ती । आदि तोचि अंतीं अवसान ॥ध्रु.॥
भोग नारायणा देऊनि निराळीं । ओविया मंगळीं तोचि गाती ॥२॥
बळ बुद्धि त्यांची उपकारासाठी । अमृत तें पोटी सांठविलें ॥३॥
दयावंत तरी देवाचि सारखीं । आपुलीं पारखीं नोळखती ॥४॥
तुका म्हणे त्यांचा जीव तोचि देव । वैकुंठ तो ठाव वसती ते ॥५॥

अर्थ

अर्थ:–विष्णूच्या दासाला मुक्तीची चिंता भेडसावत नाही किंवा त्याला तो कठीण आहे असे देखील नाही तसेच संसार कसा असतो किंवा तो कसा करावा हे तो जाणत देखील नाही कारण त्यांच्या चित्ती गोविंदच जडून गेला असल्याने त्यांच्या आदी, अंती आणि अवसानी तोच बसला आहे.म्हणजेच कोणतेही कर्म करण्याचे कारण देवच असून आणि ज्यांच्यासाठी करायचे ते देखील त्यांस देवाला अर्पण करण्यासारखे असते त्यामुळे त्याच्या ध्यानीमनी देखील तोच वसतो.तसेच त्याच्या वाट्याला जे जे भोग येतात ते सर्व ते नारायणाला अर्पण करून व स्वतः त्या भोगापासून नामानिराळी राहून सदैव देवाच्या नामस्मरणात ते मग्न असतात आणि देवाला प्रसन्न कण्याच्या ज्या ज्या मंगळ ओव्या आहेत तेच गाण्यात त्यांना आनंद मिळतो.तसेच स्वतःची पूर्ण शक्ती आणि बुद्धी ते इतरांच्या कल्याणासाठी व सामान्यांवर उपकार करण्यासाठी ते खर्च करतात, नामस्मरणामुळे कृपारूपी अमृत जे त्यांच्या पोटी साठलेले असते ते इतरांनां कसे देता येईल ह्यासाठीच त्यांची धडपड असते.अशी ही वैष्णव मंडळी अंतःकरणाने अत्यंत दयावंत असून देवासारखीच भासतात किंबहुना देवात आणि त्यांच्यात फरक हा जाणवतच नाही, कारण ह्यांना आपले


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *