सार्थ तुकाराम गाथा

हरीची हरीकथा नावडे जया – संत तुकाराम महाराज अभंग – 1714

हरीची हरीकथा नावडे जया – संत तुकाराम महाराज अभंग – 1714

हरीची हरीकथा नावडे जया । अधम म्हणतां तया वेळ लागे ।
मनुष्यदेहीं तया नाट लागलें । अघोर साधिलें कुंभपाक ॥१॥
कासया जन्मा आला तो पाषाण । जंत कां होऊन पडिला नाहीं ।
उपजे मरोनि वेळोवेळां भांड । परि न धरी लंड लाज कांहीं ॥ध्रु.॥
ऐसियाची माता कासया प्रसवली । वर नाहीं घातली मुखावरी ।
देवधर्मांविण तो हा चांडाळ नर । न साहे भूमि भार क्षणभरी ॥२॥
राम म्हणतां तुझें काय वेचेल । कां हित आपुलें न विचारिसी ।
जन्मोजन्मींचा होईल नरकीं । तुका म्हणे चुकी जरी यासी ॥३॥

अर्थ

ज्याला हरीकथाच आवडत नाही त्याला अधम म्हणण्यास देखील वेळ लागतो इतका तो अदम असतो. अशा मनुष्याला मनुष्यदेह मिळाला खरा परंतु तो सुद्धा त्याला नाटच ठरला आणि त्याला अखेरीस कुंभीपाका सारखा नरकच प्राप्त झाला. असा दगड जन्मालाच का आला असेल बरे जंत होऊन घाणीत का बरं नाही कुठेतरी तो पडला. असा हा निर्लज्ज मनुष्य किती वेळा जन्माला येतो आणि किती वेळा मरतो तरीदेखील त्याला लाज कशी नाही. अशा माणसाला त्याची आई का बरे प्रसवली असेल तो जन्मताच त्याच्या तोंडावर त्याच्या आईने वार घालून त्याला का बर मारले नसेल? असा चांडाळ देव मानत नाही, धर्म मानत नाही अशा चांडाळाचा याचा भार पृथ्वीला देखील सहन करता येत नाही. अरे मुखाने नुसते राम राम जरी म्हटले तरी तुझे काही खर्च होणार आहे काय अरे तुला तुझो हीत कसे समजत नाही? तुकाराम महाराज म्हणतात जर असा मनुष्य देवाला, धर्माचाराला चुकत असेल तर तो केवळ जन्मोजन्मी नरकवास भोगेल.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *