सार्थ तुकाराम गाथा

उत्तम घालावें आमुचिये मुखीं – संत तुकाराम महाराज अभंग – 1721

उत्तम घालावें आमुचिये मुखीं – संत तुकाराम महाराज अभंग – 1721

उत्तम घालावें आमुचिये मुखीं । निवारावें दुःखी होऊ नेदी ॥१॥
न बैसे न वजे जवळूनि दुरी । मागें पुढें वारी घातपात ॥ध्रु.॥
नाहीं शंका असो भलतिये ठायीं । मावळलें पाहीं द्वैताद्वैत ॥२॥
तुका म्हणे भार घेतला विठ्ठलें । अंतरीं भरलें बाह्य रूप ॥३॥

अर्थ

हा पांडूरंग जे उत्तम आहे तेच आमच्या मुखामध्ये घालतो ते म्हणजे हरीनाम आणि आम्हाला कधीही हा पांडूरंग दु:खी होऊ देत नाही आमचे सर्व दु:ख निवारण करतो. हा पांडूरंग कधी बसत नाही व कधीही आमच्याजवळून दूर जात नाही केवळ आमच्यासाठी व आमच्यावर मागेपुढे होणाऱ्या घातपाताचे निवारणही हा करतो. आता आम्हाला कसल्याही प्रकारचे भय राहीले नाही कारण आमच्या मनातील द्वैत अद्वैत मावळले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “या पांडूरंगानेच आमच्या योगक्षेमाचा भार घेतला आहे व त्याचेच रुप आमच्या अंतरंगात व बाह्यरंगात भरले आहे.”


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *