सार्थ तुकाराम गाथा

काय केलें जळचरीं – संत तुकाराम महाराज अभंग – 1739

काय केलें जळचरीं – संत तुकाराम महाराज अभंग – 1739

काय केलें जळचरीं । ढीवर त्यांच्या घातावरी ॥१॥
हा तों ठायींचा विचार । आहे यातिवैराकार ॥ध्रु.॥
श्वापदातें वधी । निरपराधें पारधी ॥२॥
तुका म्हणे खळ । संतां पीडिती चांडाळ ॥३॥

अर्थ

जलचर प्राण्यांनी कोळयांचे काही अपराध केलेले असतात का तर नाही तरी देखील ते कोळी लोक त्यांचा घात करतात. हा प्रकार म्हणजे पहिल्यापासूनच चालत आलेला असतो काही जातींचा काही जातींशी वैर असते. रानातील श्वापदे निरापराध असतात असे असून देखील पारधी लोक त्यांचा वध करतात. तुकाराम महाराज म्हणतात, “अगदी त्याप्रमाणे दुष्ट नालायक चांडाळ माणसे संतांनाही काही कारण नसताना त्रास देतच असतात.”


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *