सार्थ तुकाराम गाथा

जाऊनियां तीर्था काय तुवां केलें -संत तुकाराम महाराज अभंग – 1750

जाऊनियां तीर्था काय तुवां केलें -संत तुकाराम महाराज अभंग – 1750

जाऊनियां तीर्था काय तुवां केलें । चर्म प्रक्षाळिलें वरीं वरीं ॥१॥
अंतरींचें शुद्ध कासयानें जालें । भूषण तों केलें आपणया ॥ध्रु.॥
वृंदावन फळ घोळलें साकरा । भीतरील थारा मोडेचि ना ॥२॥
तुका म्हणे नाहीं शांति क्षमा दया । तोंवरी कसाय फुंदा तुम्ही ॥३॥

अर्थ

अरे तू तीर्थयात्रेला जाऊन विशेष कार्य काय केले आहेस केवळ पवित्र नद्यांमध्ये स्नान करून वर वर देहाची कातडी धुतली. अरे पण तुझे अंतकरण अजुन शुद्ध कुठे झाले?केवळ स्वतःकरता तीर्थयात्रा केली व याचे भूषण तू प्राप्त केले आहे. कडू वृंदावन फळ कितीही साखरेत घोळले तरी त्याच्या आतील कडूपणा केव्हाच जात नाही. तुकाराम महाराज म्हणतात तीर्थयात्रा केल्याची व्यर्थ बडबड का करता जोपर्यंत तुमच्या अंतकरणात शांति ,क्षमा ,दया येत नाही तोपर्यंत याचा काहीच उपयोग होणार नाही.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *