सार्थ तुकाराम गाथा

नसावें ओशाळ – संत तुकाराम महाराज अभंग – 1768

नसावें ओशाळ – संत तुकाराम महाराज अभंग – 1768

नसावें ओशाळ । मग मानिती सकळ ॥१॥
जाय तेथें पावे मान । चाले बोलिलें वचन ॥ध्रु.॥
राहों नेदी बाकी । दान ज्याचें त्यासी टाकी ॥२॥
होवा वाटे जना । तुका म्हणे साठीं गुणां ॥३॥

अर्थ

जो कोणाचाही निंदा करत नसतो त्याला सगळे लोक चांगले म्हणतात. तो जेथे जाईल तेथे तेथे त्याला मानसन्मान मिळतो आणि तो जसे बोलेल तसेच लोक वागतात. तो कोणाचीही बाकी ठेवत नाही आणि जर एखाद्याची बाकी राहिली तर त्याचे तो पटकन दान देऊन टाकतो. तुकाराम महाराज म्हणतात त्याच्या याच गुणामुळे लोकांना त्याची आवड लागते.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *