सार्थ तुकाराम गाथा

बळिवंत आम्ही समर्थाचे दास – संत तुकाराम महाराज अभंग – 1795

बळिवंत आम्ही समर्थाचे दास – संत तुकाराम महाराज अभंग – 1795

बळिवंत आम्ही समर्थाचे दास । घातली या कास कळिकाळासी ॥१॥
तेथें मानसाचा कोण आला पाड । उल्लंघोनि जड गेलों आधीं ॥ध्रु.॥
संसाराचे बळी साधिलें निधान । मारिले दुर्जन षडवर्ग ॥२॥
तुका म्हणे एक उरला धरिता ठाव । येर केले वाव तृणवत ॥३॥

अर्थ

आम्ही बलवंत समर्थ हरीचे दास आहोत त्यामुळे आम्ही ही बलवंत झालो आहोत व त्याच बळाच्या जोरावर आणि कळीकाळाला देखील कास घातली आहे. मग तेथे सर्वसामान्य माणसाचा तरी काय पाड आहे आम्ही जडाला देखील उल्लंघुन गेलो आहोत. आम्ही संसाराचा बळी देऊन हरी रूप आणि ध्यान साधले आहे, काम क्रोध मदमत्सर अहंकार हे दुर्जन आम्ही मारले आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता आम्ही हरीच्याच ठिकाणी ठाव धरला आहे बाकी सर्व आम्ही गवताप्रमाणे मानले आहे.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *