सार्थ तुकाराम गाथा

म्हणसी होऊनी निश्चिंता – संत तुकाराम महाराज अभंग – 1801

म्हणसी होऊनी निश्चिंता – संत तुकाराम महाराज अभंग – 1801

म्हणसी होऊनी निश्चिंता । हरूनियां अवघी चिंता । मग जाऊं एकांता
भजन करूं । संसारसंभ्रमें आशा लागे पाठी । तेणें जीवा साटी होईल तुझ्या ॥१॥
सेकीं नाडसील नाडसील । विषयसंगें अवघा नाडसील । मागुता पडसील भवडोहीं ॥ध्रु.॥
शरीर सकळ मायेचा बांधा । यासी नाहीं कदा अराणूक । करिती तडातोडी
आंत बाह्यात्कारीं । ऐसे जाती चारी दिवस वेगीं ॥२॥
मोलाची घडी जाते वांयांविण । न मिळे मोल धन देतां कोंडी ।
जागा होई करीं हिताचा उपाय । तुका म्हणे हाय करिसी मग ॥३॥

अर्थ

मानवा तू असे म्हणशील की मी आता या संसारातून निश्चिंत होईल आणि संसाराची सर्व चिंता मी बाजूला सारीन, मग मी एकांतात जाईन व हरीचे भजन करीन. असे तू जर म्हटला तरच तुझा परमार्थ होईल, नाही तर तू जर संसार खरा मानला तर तो भ्रम तुझ्या पाठीमागे आशेच्या,इच्छेच्या रूपाने लागेल आणि त्यांच्या आशेच्या,इच्छेच्या पाठीमागे पळून पळून तुझ्या जीवनाचा अंत होईल. अरे शेवटी तु ह्या संसार भ्रमातच गुंतून राहशील. अरे तू विषया संगेच गुंतून राहसील आणि शेवटी या भवडोहात पडशील. अरे हे शरीर आणि सर्वकाही मायेचे स्वरूप आहे यामध्ये तुला कधीही विश्रांती मिळणार नाही. अरे तुझ्या आयुष्यात तुझ्या अंर्तबाह्य विकारच तुझी ताडातोड करतील आणि याच्यातच तुझे आयुष्याची चार दिवस वेगाने निघून जातील. तुकाराम महाराज म्हणतात अरे तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण मोलाचा आहे आणि तो व्यर्थ वाया जात आहे कितीही पैसे धन-दौलत दिले तरी गेलेला क्षण तुला परत मिळणार नाही. अरे तू जागा हो आणि स्वतःच्या हिताचा उपाय कर स्वत:च्या हितासाठी प्रयत्न कर एकदा की वेळ निघून गेली तर तू केवळ हाय हाय क


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *