संत तुकाराम अभंग

देवासी लागावे सकळांसी पोसावें – संत तुकाराम महाराज अभंग – 1809

देवासी लागावे सकळांसी पोसावें – संत तुकाराम महाराज अभंग – 1809

देवासी लागावे सकळांसी पोसावें । आम्हां न लगे खावें काय चिंता ॥१॥
देवा विचारावें लागे पापपुण्य । आह्मासी हे जन अवघें भलें ॥ध्रु.॥
देवासी उत्पत्ती लागला संहार । आम्हां नाहीं फार थोडें काहीं ॥२॥
देवासी काम लागला धंदा । आह्मासी ते सदा रिकामीक ॥३॥
तुका म्हणे आम्ही भले देवाहून । विचारितां गुण सर्वभावें ॥४॥

अर्थ

देवाला सगळ्यांचे पालन-पोषण करण्याची चिंता असते परंतु आम्हाला तर काय खावे ,काय नाही याची देखील चिंता करण्याची गरज नाही. देवाला तर सर्व लोकांचे पापपुण्य विचारात घ्यावे लागते परंतु आम्हाला तर सर्व लोक चांगले आहेत. देवाला तर संहार आणि उत्पत्ती हे काम मागे लागले आहेत परंतू आम्हाला तर थोडेफार देखील काहीच काम नाही. देवाच्या पाठीमागे तर चांगलांच काम धंदा लागलेला आहे परंतु आम्ही तर सदा सर्वदा रिकामेच आहोत. तुकाराम महाराज म्हणतात जर दोघांच्याही गुणांचा विचार केला तर देवापेक्षा आम्ही भले आहोत की.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *