सार्थ तुकाराम गाथा

संचितावांचून – सार्थ तुकाराम गाथा 1492

संचितावांचून – सार्थ तुकाराम गाथा 1492

संचितावांचून । पंथ न चलवे कारण ॥१॥
कोरडी ते अवघी आटी । वांयां जाय लाळ घोंटीं ॥ध्रु.॥
धन वित्त जोडे । देव ऐसें तों न घडे ॥२॥
तुका म्हणे आड । स्वहितासी बहु नाड ॥३॥

अर्थ

पूर्वपुण्य असल्याशिवाय मनुष्य परमार्थाकडे वळत नाही कारण पूर्वपुण्य चांगले असेल तरच मनुष्यला परमार्थाची आवड लागते. वरवर हरीची भक्ती केल्याने काहीच उपयोग होत नाही हरीची कृपा होण्याकरिता लाळ घोटावी लागते. धन द्रव्याच्या जोरावर देव जोडला जातो असे केंव्हाही होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात आपण केलेले पापच आपल्या स्वहिताच्या आडवे येते.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *