सार्थ तुकाराम गाथा

नाहीं सरो येत जोडिल्या वचनीं – सार्थ तुकाराम गाथा 1495

नाहीं सरो येत जोडिल्या वचनीं – सार्थ तुकाराम गाथा 1495

नाहीं सरो येत जोडिल्या वचनीं । कवित्वाची वाणी कुशळता ॥१॥
सत्याचा अनुभव वेधी सत्यपणें । अनुभवाच्या गुणें रुचों येतों ॥ध्रु.॥
काय आगीपाशीं शृंगारिलें चाले । पोटींचें उकले कसापाशीं ॥२॥
तुका म्हणे येथे करावा उकल । लागेचि ना बोल वाढवूनि ॥३॥

अर्थ

अभक्त मनुष्याने कितीही कुशलता पूर्वक शब्दाला शब्द जोडून कवित्व केले तरी ते देवाला मान्य होत नाही. ज्याच्याकडे खरेच अनुभव आहे त्याचे बोलणे इतर लोकांना पटते व त्या अनुभवाच्या गुणामुळे त्याचे बोलणे सर्वांना आपल्याकडे वेधून घेते. एखाद्या शूद्र धातूला वरवर नुसता सोन्याचा मुलामा लावला आणि तो धातू अग्नी पुढे नेला तर त्याच्यावरील सोने वितळून जाते व त्या धातूचे खरे स्वरूप सर्वांच्या समोर येते अगदी त्याप्रमाणे एखाद्या मनुष्याने कितीही काव्यरचना केली तरी त्याचे संतांपुढे खरे स्वरूप उघडे पडते. तुकाराम महाराज म्हणतात ज्याला खरोखरच अनुभव आहे त्या ला कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण द्यावे लागत नाही कारण त्याच्या अनुभवावरूनच त्याचे खरे स्वरूप स्पष्ट होते.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *