सार्थ तुकाराम गाथा

सर्वस्वासी मुकावें तेणें हरीसी जिंकावें – सार्थ तुकाराम गाथा 1559

सर्वस्वासी मुकावें तेणें हरीसी जिंकावें – सार्थ तुकाराम गाथा 1559

सर्वस्वासी मुकावें तेणें हरीसी जिंकावें । अर्थ प्राण जीवें देहत्याग ॥१॥
मोह ममता माया चाड चिंता । विषया कंदुव्यथा जाळूनियां ॥ध्रु.॥
लोकलज्जा दंभ आणि अहंकार । करूनि मत्सर देशाधडी ॥२॥
शांति क्षमा दया सखिया विनउनी । मूळ चक्रपाणी धाडी त्यांसी ॥३॥
तुका म्हणे याती अक्षरें अभिमान । सांडोनिया शरण रिघें संतां ॥४॥

अर्थ

ज्याला हरीला जिंकायचे आहे त्याने अर्थ, प्राण, जीव, देह सर्वांचा त्याग करावा. सर्व गोष्टीला जो मुकतो तोच हरीला जिंकू शकतो. मोह, ममता, माया, इच्छा, चिंता आणि विषय भोग, व्यथा जाळून लोकलज्जा, दंभ, अहंकार, मत्सर यांना देशोधडीला लावले. शांति, क्षमा, दया या मित्रांना विनंती करून चक्रपाणी हरीला बोलावून्या करिता मूळ पाठवावा. तुकाराम महाराज म्हणतात अरे तुम्ही जातीचा, अक्षर अज्ञानाचा अभिमान टाकून द्या आणि संतांना शरण जावे.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *