संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

सखी म्हणे बाई समपण तें कैसें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १५१

सखी म्हणे बाई समपण तें कैसें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १५१


सखी म्हणे बाई समपण तें कैसें ।
येरी म्हणे देश हिंडूं नको ॥१॥
आंधीम शोधी आप मग पाही दीप ।
कोहं सोहं दीप दवडी दुरी ॥२॥
त्रिपुटीं झोंबों नको मायावी सकळ ।
अवघा सरळ हरी आहे ॥३॥
ज्ञानदेव बुझवी बुझे ज्ञानधारणा ॥
तुज मज सौजन्य येणें न्यायें ॥४॥

अर्थ:-

एक सखी, दुसऱ्या सखीला विचारते बाई साम्यावस्था ती काय ग? सखी म्हणते, अग या नादाने उगीच इकडे तिकडे म्हणजे भलत्याच साधनांत तूं गुंतू नकोस. कारण ज्ञाता, ज्ञान ज्ञेयादि सर्व त्रिपुट्या मायाकार्य आहेत. त्यांना तूं झोंबू नकोस कारण यश्चावत् सर्व त्रैलोक्यां श्रीहरिच आहे. याकरिता तूं अगोदर ‘कोऽहं’ म्हणजे मी कोण आहे. याचा विचार कर. व असा विचार केला असता सोऽहं’ म्हणजे तो परमात्मा मी आहे. असा आपला अनुभव घे. व ती वृत्ति सुद्धा टांकून दे. या ज्ञानधारणेला तूं समजून घेतले आणि ती वृत्ति निवृत्त केली असता तुझ्या माझ्यामध्ये एकरूपता होईल. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


सखी म्हणे बाई समपण तें कैसें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १५१

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *