संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

काळां पैं गोवळु काळासि आलोट – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३५३

काळां पैं गोवळु काळासि आलोट – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३५३


काळां पैं गोवळु काळासि आलोट ।
नामामृतें पाठ भक्ता देहीं ॥
नित्य सुखा आह्मां तपांचिया कोडीं ।
न लागती परवडी व्रतें तीर्थे ॥१॥
सुलभ सोपारा सर्वाघटीं अससी ।
साधुसंगें दिससी आम्हा रया ॥२॥
चैतन्याशेजारीं मन पैं मुरालें ।
सावळें सानुलें ह्रदयघटीं ॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलराज ।
निवृत्तीनें बीज सांगितलें ॥३॥

अर्थ:-

जो भगवान श्रीकृष्ण तो स्वरुपाने काळा असून जगाचे भक्षण करणारा जो काळ त्या काळाचाही काळ आहे. अशा श्रीकृष्णाच्या नामामृताचा पाठ भक्तांच्या हृदयांमध्ये असल्यामुळे ते नेहमी सुखी आहेत. त्या सुखाकरिता कोट्यवधी तपे अगर व्रते अथवा तीर्थे भक्तांना करावे लागत नाही. सर्व जीवमात्रामध्ये सहज रितीने भरलेला तूं साधुसंगतीने आम्हाला स्पष्ट दिसतोस.तुझ्या चैतन्यरुप बिछान्याच्या ठिकाणी आम्हा भक्ताचे मन मुराले. त्यामुळे अंतःकरणरुपी घटांत तुझे सांवळे व सकुमार लहानरुप स्पष्ट दिसत आहे. अशा त-हेचा परमात्मा माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल हाच सर्व जगाचे बीज आहे. असे श्रीगुरु निवृत्तिरायांनी आम्हास सांगितले असे माऊली सांगतात.


काळां पैं गोवळु काळासि आलोट – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३५३

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *