संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

निरंतर ध्यातां हरि – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४०८

निरंतर ध्यातां हरि – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४०८


निरंतर ध्यातां हरि ।
सर्व कर्माची बोहरी ।
दोष जाती दिगंतरीं ।
रामकृष्णउच्चारणीं ॥१॥
जप तीर्थ हेंचि नाम ।
जपव्रता हेंचि नेम ।
ऐसें धरोनियां प्रेम ।
तोचि भक्त तरेल ॥२॥
जीव शिव एक करी ।
शांति क्षमा जरी धरी ।
त्यापाशीं नित्य श्रीहरी ।
प्रत्यक्ष आपण उभा असे ॥३॥
ज्ञानदेव म्हणे नित्य ।
त्याचें वचन तेंचि सत्य ।
त्यांचे वचन सर्व कृत्य ।
सिध्दि पावेल सर्वथा ॥४॥

अर्थ:-

रामकृष्णनामाचे निरंतर ध्यान केले तर सर्व कर्मांचा नाश होतो व दोष दिंगतरी जातात. जप हेच तीर्थ व जप हेच व्रत हे प्रेमाने मानले तर तो भक्त तरुन जातो. जीवसेवा हे हीच शिवपूजा आहे मानतो, शांती व क्षमा ह्यांचा अंगिकार करतो, त्याच्या जवळ प्रत्यक्ष श्रीहरि उभा राहतो. जो ह्या मार्गाचा नित्य अवलंब करेल त्याचे वचन हे सत्य होते व त्याचे वचन हे पूर्ण होते त्याला सर्वसिध्दी प्राप्त होतात असे माऊली सांगतात.


निरंतर ध्यातां हरि – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४०८

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *