संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

जन्म जरा दु:ख बाधा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४०९

जन्म जरा दु:ख बाधा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४०९


जन्म जरा दु:ख बाधा ।
स्मरता नाहीं गोविंदा ।
ऐसा जयासी नित्य धंदा ।
तोचि सदा सुखरुप ॥१॥
धन्य कुळ धन्य याती ।
धन्य जन्म पुढती पुढती ।
भक्तीवीण नाहीं गती ।
मुखीं हरिनामउच्चार ॥२॥
विश्वीं विश्व जो व्यापकु ।
तोचि माझा हरि एकु ।
त्यासी भक्तिविण साधकु ।
नोळखे पै दुर्बुध्दि ॥३॥
ज्ञानरंजनीं रंजला ।
ज्ञानबोधें उपजला ।
ज्ञानदेवीं हरि सेविला ।
निरंतर सर्वकाळ ॥४॥

अर्थ:-

गोविंदाचे स्मरण करताच जन्म, जरा व दुःख निघुन जाते. हा नामछंदाचा धंदा नित्य करणारा सदोदित सुख भोगतो. ज्याच्या मुखी हरिनाम आहे त्याचे कुळ त्याची याती येवढेच नव्हे तर पुढचा जन्म ही धन्य होतो त्यामुळे भक्तिविन गती नाही. विश्वाचे विश्व असणाऱ्या त्या हरिला प्राप्त करण्यासाठी साधकाला नामभक्तिशिवाय उपाय नाही.मात्र हे दुर्बुध्दी असलेल्याला कसे कळेल? ज्ञान रंगी रंगलेला व ज्ञानबोधाने जो उपजलेला त्या श्रीहरिची सेवा मी निरंतर केली असे माऊली सांगतात.


जन्म जरा दु:ख बाधा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४०९

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *