संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

संपत्तिविपत्तिदु:ख – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४१०

संपत्तिविपत्तिदु:ख – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४१०


संपत्तिविपत्तिदु:ख ।
हरेल अवघा शोक ।
वेगीं करुनिया विवेक ।
हरिस्मरण करी ॥१॥
मंत्र यंत्रसूत्रधारी ।
सिध्द साध्य तोचि हरि ।
नित्य जपोनि वैखरी ।
आप्तता करी हरीसी ॥२॥
ध्यान मन एक चित्त ।
अलक्ष लक्षी अच्युत ।
न सांगे हिताची मात ।
अखंड जपे हरिनाम ॥३॥
ज्ञानदेवें जप केला ।
मग समाधीस बैसला ।
नाम घेतां बोध जाला ।
देव आला ह्रदयासी ॥४॥

अर्थ:-

विवेकाने हरिस्मरण करणाऱ्याला संपत्तीचा वियोग होत नाही त्याचे दुःख व शोक याचे हरण होते. मंत्र व तंत्र सिध्द होण्यासाठी तोच सुत्रधार असणारा हरि आहे व अशा हरिला वैखरीने हरिनाम घेऊन आप्त करुन घे. त्याचे ध्यान व मनन चित्तात करुन आपले लक्ष हे अच्युत प्राप्ती करावे व ते फक्त हरिनामे साध्य होते ही हिताची गोष्ट सांगतो. मी समाधीला बसताना त्याचे स्मरण केले त्याच्या नामाचा बोध घेतला व त्यामुळे स्थापित झाला असे माऊली सांगतात.


संपत्तिविपत्तिदु:ख – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४१०

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *