संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

प्रेम जयाचें कथेवरी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४१३

प्रेम जयाचें कथेवरी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४१३


प्रेम जयाचें कथेवरी ।
तोचि धन्य ये चराचरी ।
रामकृष्ण निरंतरी ।
मुखीं आवडी जपतसे ॥१॥
धन्य धन्य तोची वंशी ।
धन्य धन्य माता कुशी ।
धन्य धन्य काळ तयासी ।
कृष्णराम ह्मणतांची ॥२॥
ऐसें धन्य जन्म तयाचे ।
धन्य धन्य पुण्य साचे ।
त्यासीं भय कळिकाळाचें ।
नाहीं जन्म घेतलिया ॥३॥
एवढा महिमा नामाचा ।
धन्य तो राम उच्चारी वाचा ।
धन्य जन्म तयाचा ।
ज्ञानदेव म्हणे ॥४॥

अर्थ:-

ज्याचे हरिकथेवर प्रेम आहे जो रामकृष्णनामचा सतत उच्चार आवडीने करतो तो ह्या चराचरात धन्य आहे. रामकृष्णनामाचा उच्चार केला तर त्या वंश धन्य होतो, त्याची माता धन्य होते, त्याचा जीवनकाळ सुखमय होतो. त्याचा जन्म धन्य होतो, त्याला पुण्यप्राप्ती होते त्याला कळीकाळाचे भय उरत नाही व परत जन्म ही घ्यावा लागत नाही. येवढा महिमा एक नामचा असुन त्याचा जन्म रामनाम उच्चाराने धन्य होतो असे माऊली सांगतात.


प्रेम जयाचें कथेवरी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४१३

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *