संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

तत्त्वमस्यादि वाक्यउपदेश – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४३१

तत्त्वमस्यादि वाक्यउपदेश – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४३१


तत्त्वमस्यादि वाक्यउपदेश ।
नामाचा अर्धांश नाहीं तेथें ।
ह्मणोनि नामसंकीर्तन करिता
जवळी जोडलासि आतां ।
क्षणु न विसंबे जिवाचिया
जीवना रया ॥१॥
नाम निजधीर गर्जती
वैष्णव वीर ।
कळिकाळ यमाचे भार पळाले तेथें ॥२॥
म्हणौनि नाम वज्रकवच
तोचि निर्गुणाचा अभ्यास ।
पाहेपां स्वप्रकाश विचारुनी ।
ऐसें सुंदर रुपडें ह्रदयीं धरिलें आतां ।
पाहातां केवि होये पुनर्योनि रया ॥३॥
ऐसा सकळां अकळ कळला ।
ह्रदयीं धरिला समता बुध्दी ।
बापरखुमादेविवरु विठ्ठलु चिंतिता ।
तुटली जन्माची
आधी व्याधी रया ॥४॥

अर्थ:-

तत्वमसी ह्या महावाक्याचे फल ही नामफलाच्यापेक्षा अर्धेच असते.म्हणुन हे जीवीच्या जीवना आता क्षणभर ही न विसंबता नामसंकिर्तनाला जवळ जोडत आहे. मोठे धैर्यवान वैष्णववीर नामघोषाची गर्जना करत असतात.त्यामुळे घाबरुन कळीकाळ असलेले यमदुत ही तेथुन पळत सुटतात. त्या नामाच्या वज्रकवचाच्या सुरक्षेमुळे निर्गुणाचा अभ्यास व स्वप्रकाशरुप आत्मज्ञान ही तपासता येते. असे ते सुंदर रुप मनात धरले तर परत जन्म कसा येईल? असे ते माझे पिता व रखुमाईचे पती जे इतर कोणत्याही साधनाने कळत नाहीत.त्यांना समताबुध्दीने हृदयी धरल्यामुळे माझी जन्ममरणाची आधीव्याधी समुळ तुटुन गेली असे माऊली सांगतात.


तत्त्वमस्यादि वाक्यउपदेश – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४३१

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *