संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

तैं सत्त्वरजतमें धुतलिया आशा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४७३

तैं सत्त्वरजतमें धुतलिया आशा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४७३


तैं सत्त्वरजतमें धुतलिया आशा ।
वेगीं त्या निराशा फ़ळेवीण ॥१॥
तैसें हें टवाळ हरिविण पाल्हाळ ।
कैसेनि मायाजाळ निरसे रया ॥२॥
त्रिपुटीचे पेठे वानवसा दिठा ।
वैकुंठ चोहटा पिकला रया ॥३॥
बापरखुमादेविवरुविठ्ठलु साजीरा ।
मार्गी मार्ग एकसरा नामें तारी ॥४॥

अर्थ:-
सत्व, रज, तम व आशा यांचा मळ धुतल्याशिवाय परमात्मरूपी फळाचा आशा करणे फुकट आहे.तसेच ह्रीची प्राप्ती झाल्याशिवाय बाकीची इतर साधने करणे फुकट पाल्हाळ आहे. हरिचितनाशिवाय मायेचा निरास कसा होईल. सत्व, रज, तमाच्या पेठेत पंढरीत तो प्रगटला आहे.होऊन सर्वांना सोपा झाला आहे.रखुमादेवीचे पती व माझे पिता श्रीविठ्ठल हे सुंदर असून त्यांच्या नाममार्गाचा एकटा मार्ग तारक आहे असे माऊली सांगतात.


तैं सत्त्वरजतमें धुतलिया आशा – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४७३

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *