संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

एका पांडुरंगें नव्हेचि पै जोडी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४७९

एका पांडुरंगें नव्हेचि पै जोडी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४७९


एका पांडुरंगें नव्हेचि पै जोडी ।
दया गेले ठाया मज आला रहावया ।
मत्सर गिळावया कुळासहित ॥१॥
क्षमा गेली परती अहंकार सांगती ।
तें वोढूंनियां नेती अघोराशी ॥२॥
गति म्हणे मी थोर प्रवृत्ति निघाला घोर ।
राहों न शके घरी निवृत्ति तेथें ॥३॥
ज्ञानदेवो सांगे असे मज पांडुरंगें ।
लक्ष्मीये रिघे शरण आडवा ॥४॥

अर्थ:-
आसुरी संपत्तीने युक्त होऊन केल्या जाणार्या पांडुरंगाच्या नुसत्या भक्तिने म्हणजे दैवी संपत्तीने रहित असलेल्या भक्तिने मोक्ष प्राप्त होणार नाही. उलट कुलनाशक मद मत्सर येऊन राहतात.मनातील क्षमा जाऊन त्या ठिकाणी अहंकार आला तर जीवाला अघोरी नरक प्राप्त होतो. जेथे वैराग्य निवृत्ती नाही तेथे तेथे प्रवृत्तीला अघोराची गती मिळते. तसे असेल तर लक्ष्मी दैवी संपत्तीसह पांडुरंगाला तुमच्या साठी आडवुन ठेवते असे माऊली सांगतात.


एका पांडुरंगें नव्हेचि पै जोडी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४७९

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *