संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

दीपीं दीप सामावे तेथें कैचा विचारु – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४७८

दीपीं दीप सामावे तेथें कैचा विचारु – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४७८


दीपीं दीप सामावे तेथें कैचा विचारु ।
राहिला निर्ध्दारु नाना मत्ता ॥१॥
जें जेथें होतें तें तेथें नाहीं ।
परतोनि काई पाहातोसि ॥२॥
मौनचिये मिठी सगळेंचि नाहीं ।
तैसा इंद्रियां दाही चोजवेना ॥३॥
ज्ञानदेवो बोले सामावलें मन ।
मन नायकती कान तेथील कथा ॥४॥

अर्थ:-
परमात्म्याचे प्रतिपादन करणारी अनेक मते आहेत. पण ज्योतीत ज्योत मिळावी त्या प्रमाणे गुरूकृपेने आल्याचे ब्रह्मत्वाने ज्ञान झाल्यानंतर बाकीचे मते जागच्या जागी निवांत राहिली. जे जेथे होते ते तेथे नाही परतुन काय पाहतोस. तशी आत्मस्थिती स्थिती पडली मौनाची मिठी पडली की तो विषयांना इंद्रिय विषय नाही. शब्दासह मन परमात्म स्वरूपात लीन झाल्यानंतर प्रपंचाची कथा कान ऐकणार नाहीत असे माऊली सांगतात.


दीपीं दीप सामावे तेथें कैचा विचारु – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४७८

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *