संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

मी माझें करुनि देह चालविसी वायां – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४५०

मी माझें करुनि देह चालविसी वायां – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४५०


मी माझें करुनि देह चालविसी वायां ।
आतां जेथींचा तेथें निमोनि जाय
ऐसें कीजे देवराया ॥१॥
जंव जंव गोड तंव तंव जाड ।
जाड गोड दोन्ही नको रया ॥२॥
त्रिगुणवोझें जडपण रचूनि लोटुनि देसी महापुरीं ।
आवर्त वळसा पडिलिया मग
तेथें कैची असे उरी रया ॥३॥
ऐसे लटिकेंचि गार्‍हाणें देवों मी किती ।
तुज नये काकुलती ।
बापरखुमादेविवरा विठ्ठला म्या
तुजमाजी घेतली सुति रया ॥४॥

अर्थ:-

देहाच्या ठिकाणी मी आणि देहसंबंधी पुत्रमित्रांच्या ठिकाणी माझे असा व्यवहार वाढवून देह व्यर्थ चालवितोस. त्यापेक्षा मूळ स्वरूपापासून देहादिकांची उत्पत्ति झाली.त्याच ठिकाणी आपले ऐक्य करून द्यावे. जो जो हे विषय सुख तुला गोड वाटते तों तों ते परिणामी जड दुःखप्रद असते. म्हणून त्या वैषयिक सुखदुःखाच्या नादी लागू नकोस. त्रिगुणाचे म्हणजे सत्त्व, रज, तमाचे हे शरीर रचून ते दुःखप्रद शरीर जीवाच्या गळ्यांत अटकवून संसाराच्या मोहपूरांत लोटून देतोस त्यामुळे त्या संसार समुद्राच्या भोवऱ्यात एकदा जीव पडला की मग त्याला तेथून सुटका कशी होणार.परमात्मव्यतरिक्त हा संसार लटका आहे. तोपर्यंत तुला जीवाविषयी दया उत्पन्न होत नाही. तो पर्यंत मी तुला त्या संसाराचे गाऱ्हाणे किती वर्णन करावे. पण गाऱ्हाणे वर्णन करण्याशिवाय दुसरा उपायच काय, रखुमादेवीचे पती व माझे पिता श्रीविठ्ठल ह्यांच्यांशी ऐक्य होण्याकरिता मला तुझा छंद लागला आहे. असे माऊली सांगतात.


मी माझें करुनि देह चालविसी वायां – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४५०

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *