संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

विठ्ठलु नाहीं जये शरीरीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४४९

विठ्ठलु नाहीं जये शरीरीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४४९


विठ्ठलु नाहीं जये शरीरीं ।
वाया कांगा जन्मले संसारी ।
विठ्ठलु नाहीं जये नगरीं
तें अरण्य जाणावें ॥१॥
विठ्ठलु नाहीं जये देशीं ।
स्मशान भूमि ते परियेसी ।
रविशशिवीण दिशा जैसी ।
रसना तैसी विठ्ठलेंविण ॥२॥
विठ्ठला वेगळें जितुकें कर्म ।
विठ्ठला वेगळा जितुका धर्म ।
विठ्ठला वेगळें बोलती ब्रह्म ।
तितुकाही श्रम जाणावा ॥३॥
सच्चिदानंदघन । पंढरिये परिपूर्ण ।
कर ठेवोनियां जघन
वाट पाहे भक्ताची ॥४॥
विठ्ठलेंविण देवो ह्मणती ।
ते संसार पुढती ।
विठ्ठलाविण तृप्ती ।
नाहीं प्रतीतिविठ्ठलेंविण ॥५॥
श्रीगुरुनिवृत्तीनें दिधलें ।
तें प्रेम कोणे भाग्यें लाधलें ।
बापरखुमादेविवर विठ्ठलें ।
ऐसें केलें ज्ञानदेवा ॥६॥

अर्थ:-

ज्या शरिरी विठ्ठल नाही ते उगाच जन्मले व ज्या नगरात विठ्ठल नाही ते अरण्य समजावे. विठ्ठल नसलेला देश स्मशान आहे तर ज्या जिभेवर विठ्ठल नाही ते चंद्र सुर्याशिवाय दिशा असण्यासारखे आहे.विठ्ठला वेगळे कर्म, धर्म व ब्रह्म म्हणजे वाउगा श्रमच आहे. ते परिपुर्ण सच्चितानंद धन कमरेवर हात ठेऊन भक्तांचे वाट पाहात आहे. जे विठ्ठल सोडुन इतर दैवते मानतात ते परत संसाराला येतात त्या विठ्ठलावीण प्रिती व तृप्ती ही नाही. हे प्रेम निवृत्तिनाथांकडुन मिळाले व माझे पिता व रखुमाईचे पती असलेल्या विठ्ठलामुळे मला प्राप्त झाले असे माऊली सांगतात.


विठ्ठलु नाहीं जये शरीरीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४४९

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *