संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

कोटीची भरोवरी सरोनी गेली शरीरीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६९२

कोटीची भरोवरी सरोनी गेली शरीरीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६९२


कोटीची भरोवरी सरोनी गेली शरीरीं ।
संसाराचि उरी कांही नुरेचिगे माये ॥१॥
लक्षाचा लाभ मज घडलागे माय ।
कवणें उपायें चरण जोडले वो ॥२॥
चिंतनीं चिंतिता काय चिंतावें ।
तें अवघेंचि मनीं रुप गिळावेंगे माये ॥३॥
बापरखुमादेविवरु देहेंवीण आलंगिला ।
तो समर्थ माल्हाथिला बाईये वो ॥४॥

अर्थ:-
प्रस्तुत शरीराला जिवंत राहाण्याला किंवा भोग भोगण्याला प्रारब्ध कर्माची सामुग्री असते. ती कोट्यवधी जन्मातील सामुग्री याच शरीरांत संपून गेल्यामुळेवपुन्हा पुन्हां जन्ममरणरूपी संसाराची स्थिती काही उरत नाही. अशी माझी स्थिती झाली. कारण जीवपदाचा लक्ष्य जो परमात्मा त्याची प्राप्ती झाली. काय पूर्वजन्मी पुण्य केले होते, की त्याचेच फल भगवंत्चरणाची प्राप्ती झाली आहे. आता माझ्याशिवाय दुसरे काही उरले नसल्यामुळे मनांमध्ये कोणत्या रूपाचे कुणी चिंतन करावे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल, तो देहभाव ‘माल्हाथिला’ म्हणजे बाधित झाला. व तोच मला प्राप्त झाला असे माऊली सांगतात.


कोटीची भरोवरी सरोनी गेली शरीरीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६९२

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *