संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

मी बोल बोलें तो गेला – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६९३

मी बोल बोलें तो गेला – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६९३


मी बोल बोलें तो गेला
कवण्या ठायां ।
हें पुसों आलों लवलह्यां वो ।
कव्हणि न सांगति मागूं धावें काह्या ।
आतां लाजिलें ऐशा स्त्रेहागे माये ॥१॥
चला कांवो मज आडोनी ।
रुप पाहोंद्या कां माझें मजलागुनी ।
वेडावलें मज देखुनी ।
शेखीं मी माझें गेलें हारपोनिगे माये ॥२॥
मी बोला आंतु कीं बोल मज आंतु
सुखें मुरालें रुप रुपांतुवो ।
बापरखुमादेविवरु विठ्ठलासि येकांतु ।
आतां पुरला अंतु ।
दुजेपणागे माये ॥३॥

अर्थ:-
मी त्या भगवंताचे शब्दाने पुष्कळ वर्णन केले. असे का झाले म्हणून शास्त्राला व संतांला घाईघाईने विचारवयास गेले. तो तेथेही शब्दाचा काही मागमोस लागला नाही. तेंव्हां मला असे कळलें की शब्दाने भगवंताचे वर्णन करणे वेडेपणाचे आहे. अशा शाब्दिक प्रेमाने तो आकलन होणारा नाही. याप्रमाणे माझी मलाच लाज वाटून त्या भगवंताच्या प्रेमाने मी भुलून गेले. त्या परमात्म्याच्या दर्शनामध्ये आड येणाऱ्याला एका बाजुला सारून मी त्या श्रीकृष्ण परमात्म्याचे दर्शन घेतले.त्याचा परिणाम असा झाला की माझ्या ठिकाणचा मीपणा नाहीसा झाला. तेंव्हा मला असा विचार पडला की माझ्या स्वरूपात शब्द आहे किंवा शब्दांत माझे स्वरूप आहे. किंवा रूपांत रूप आहे हे सर्वभाव स्वस्वरूपाच्या ठिकाणी मुरून गेले. याप्रमाणे माझे पिता व रखुमाईचे पती जे श्रीविठ्ठल त्यांच्याशी ऐक्य झाल्यामुळे द्वैतदशेचा अंतच होऊन गेला. असे माऊली सांगतात.


मी बोल बोलें तो गेला – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६९३

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *