संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७६३

सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७६३


सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी ।
रिकामा अर्धघडी राहूं नको ॥१॥
लटिका व्यवहार सर्व हा संसार ।
वायां येरझार हरिवीण ॥२॥
नाम मंत्र जप कोटी जाइल पाप ।
कृष्णनामी संकल्प धरुनि राहे ॥३॥
निजवृत्ति काढी सर्व माया तोडीं ।
इंद्रिया सवडी लपु नको ॥४॥
तीर्थव्रतीं भाव धरी ते करुणा ।
दया शांति दया पाहुणा हरि करी ॥५॥
ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तिदेवी ज्ञान ।
समधि संजीवन हरिपाठ ॥६॥

अर्थ:-

जर सुख हवे असेल तर सर्व शास्त्रांनी निवडलेले नाम निवडुन जपत राहिले पाहिजे त्या शिवाय रिकामा राहु नकोस. हा संसाराचा व्यवहार लटिका आहे उगाच यात येरझारा घालु नकोस. एका नाममंत्राने कोटी पापे जातात त्यामुळे कृष्णनामाचा संकल्प धारण कर. हे करताना स्वतःची वृत्ती काढुन टाकुन द्यावी व इंद्रियांच्या आड दडु नये. तीर्थव्रतांमध्ये शुध्द नामभाव धरावा.मनी करुणा असावी. शांती दया ह्यांचा पाहुणा हरि होतो त्यामुळे त्यांचा अंगिकार कर. असा हा संजिवन समाधीचा ज्ञानमार्ग असणारा हरिपाठ श्रीगुरु निवृत्तिनाथानी सांगितल्यामुळे प्रमाण मानला असे माऊली सांगतात.


सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७६३

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *