तुळशी विवाह

तुळशी विवाह

तुलसी विवाह (tulsi vivah)

कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौणिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशीचा श्री कृष्णाशी विवाह लावण्याची पद्धत आहे. तुलसी विवाह केल्यास कन्यादानाचे पुण्य मिळते व मोक्ष प्राप्ती होते. भारतीय संस्कृतीत तुळशीला फार महत्व आहे. श्रीविष्णूला तुळस प्रिय असल्यामुळे तिला हरिप्रिया असेही संबोधले जाते. तुळशीवाचून केलेली विष्णूची पूजा व्यर्थ ठरते असे पद्मपुराणात म्हंटले आहे. समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघाले, तेंव्हा त्याचे थेंब जमिनीवर पडले, त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला, असे मानले जाते. तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रते घेतलेली असतील त्या सर्वांचे उद्यापन करतात.


तुळसी विवाह शुभ मुहुर्त 2021 (Tulsi Vivah 2021 Shubh Muhurta)

तुळसी विवाह या वर्षी 15 नोव्हेंबर रोजी सोमवारी आहे. या दिवशी एकादशी सकाळी 6:39 वाजता सुरू होईल आणि मंगळवार, 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 8:01 वाजता संपेल. या दिवशी भगवान विष्णूच्या शालिग्राम अवताराशी माता तुळशीचा विवाह केला जाईल.


तुळसी विवाह चे  महत्व (Tulsi Vivah 2021 Importance)

देववुठनी एकादशीच्या दिवशी तुळशी आणि भगवान शालिग्राम यांचा विवाह विधीनुसार केला जातो. असे मानले जाते की या दिवशी माता तुलसी आणि भगवान शालिग्रामची पूजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात आणि वैवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर होतात. असे म्हटले जाते की तुळशी विवाह केल्याने कन्यादानसारखे पुण्य प्राप्त होते. सर्व शुभ कार्याची सुरुवात देखील देववुठनी एकादशीपासूनच होते


पूजेच्या वेळी लक्षात ठेवा या गोष्टी (Tulsi Vivah 2021)

देवउठनी एकादशीच्या दिवशी तुळशी विवाह केला जातो आणि प्रत्येक विवाहित स्त्रीने तुळशी विवाह नक्की केला पाहिजे असे मानले जाते. असे केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते. तसेच पूजेच्या वेळी काही विशेष गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.


तुळशी विवाह समाप्त .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *