संत संताजीचे अभंग

जन्म व्यर्थ जातो हा – संत संताजीचे अभंग – ८५

जन्म व्यर्थ जातो हा – संत संताजीचे अभंग – ८५


जन्म व्यर्थ जातो हा घाणा नेणता ।
काय तुज आता सांगू वर्म ।।
किँचित तो अर्थ जरी भरे मना।
मग त्याच्या ज्ञाना पार काय ।।
यमाच्या घरची जाचनी चुकली।
मूळ भेदी खोली उंच पहा ।।
संतु म्हणे मी तोँ देहीँच पाहीलेँ।
पुढील चुकविलेँ गर्भवास।।


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

जन्म व्यर्थ जातो हा – संत संताजीचे अभंग – ८५


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

संत संताजीचे अभंग

1 thought on “जन्म व्यर्थ जातो हा – संत संताजीचे अभंग – ८५”

  1. श्रीसंत संताजी महाराज जगनाडे या अंभगाव्दारे जन्माला आल्यानंतर चौर्‍याऐंशी लक्षयोनी फेरा चुकवा व भंगवत आपल्या हृदयस्थानी विराजमान आहे त्यालाओळखा तो आत्माच राम आहे म्हणुन त्यास आत्माराम म्हणतात. हे वर्म आम्हाला कळले आहे ते मी तुम्हास सांगत आहे आपल्या तेल पाडण्याचा जो घाणा आहे त्या स ज्याप्रमाणे बैलफेरा घेतो त्याप्रमाणे जीवदेखील चोऱ्यांशी लक्ष योनीचा फेरा घेत असतो मारुती सांगतात .
    जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे ! मग नुतन वेडिजे! तैसे देहातंराते स्वीकारिजे चैतन्यनाथ !!
    आत्मा हा जुना देह सोडून नवा देहधारण करित असतो. हे ज्याला कळले तोच ज्ञानी आहे . हे वर्म मला कळाले त्यामुळे मला यम फेरा चुकला व गर्भवास फेरा चुकला.
    रामकृष्णहरि????????????????
    संत जगनाडे महाराज कि जय विठ्ठल विठ्ठल

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *