swami samarth

श्री स्वामी समर्थ-स्तवन

श्री स्वामीमर्थ स्तवन


नाही जन्म नाही नाम | नाही कुणी माता पिता |
प्रगटला अदभुतसा | ब्रह्मांडाचा हाच पिता || १ ||

नाही कुणी गुरुवर | स्वये हाच सुत्रधार |
नवनाथी आदिनाथ | अनाथांचा जगन्नाथ || २ ||

नरदेही नरसिंह | प्रगटला तरुपोटी |
नास्तिकाच्या कश्यपूला |आस्तिकाची देण्यागती || ३ ||

कधी चाले पाण्यावरी | कधी धावे अधांतरी |
यमा वाटे ज्याची भीती | योगीश्वर हाच यती || ४ ||

कधी जाई हिमाचली | कधी गिरी अरवली |
कधी नर्मदेच्या काठी | कधी वसे भीमातटी || ५ ||

कालीमाता बोले संगे | बोले कन्याकुमारीही |
अन्नपूर्णा ज्याचे हाती | दत्तगुरु एकमुखी || ६ ||

भारताच्या कानोकानी | गेला स्वये चिंतामणी |
सुखी व्हावे सारे जन | तेथे धावे जनार्दन || ७ ||

प्रज्ञापुरी स्थिर झाला | माध्यान्हीच्या रविप्रत |
रामानुज करी भावे | स्वामी पदा दंडवत || ८ ||

|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, ॐ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||

२८ स्तवने = १ मंडळ, अशी २८ मंडळे केल्यास संकट दूर होते.

फलप्राप्ती झाल्यानंतर एखादे सत्कर्म करावे.


श्री स्वामी समर्थ स्तवन समाप्त .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *