pithapuram

pithapuram – तीर्थक्षेत्र पीठापूर

तीर्थक्षेत्र पीठापूर (pithapuram)

स्थान: इस्ट गोदावरी जिल्हा, आंध्रप्रदेश 
सत्पुरूष: श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज  
विशेष: श्रीपाद श्रीवल्लभ जन्मस्थान, कुकुटेश्वर मंदिर, अनघा लक्ष्मी  मंदिर, सत्यनारायण मंदिर
पादुका: श्रीपाद पादुका


श्रीपादांचे जन्मस्थान

आंध्र प्रदेशात ‘पीठापूर’ (pithapuram) गावी एक आपळराजा नावाचा आपस्तंब शाखेचा ब्राह्मण राहत होता. त्याची पतिव्रता भार्या सुमति नित्य अतिथि-पूजा करीत असे. एकदा ब्राह्मणाच्या घरी श्राद्ध असताना श्रीदत्तात्रेय अतिथी स्वरूपात आले. ब्राह्मण भोजन झाले नव्हते. त्यावेळी आपळाराजा घरी नव्हते. त्या ब्राह्मण स्त्रीने महाराजांना भिक्षा घातली. भगवान् श्रीदत्तात्रेय म्हणाले की मी प्रसन्न झालो आहे. त्यांनी तिला तिच्या मनातील इच्छा विचारली. ती म्हणाली की प्रभू मला अनेक पुत्र होऊन ते स्वर्गवासी झाले व जे वाचले ते अक्षहीन, पादहीन आहेत.

कर्तबगार पुत्राशिवाय जीवनाला काय अर्थ आहे? मला तुमच्यासारखा ज्ञानवंत, ईश्वरासमान पुत्र व्हावा. हे ऐकून श्रीदत्त-महाराज भविष्यातील त्यांच्या आविष्काराचा विचार करून प्रसन्न झाले व म्हणाले “तुला कुलभूषण, तपस्वी, कीर्तीमान असा पुत्र होईल. तो तुमचे दारिद्र्य हरण करील.” हे ऐकून ती ब्राह्मण स्त्री अति संतुष्ट झाली व तेवढ्यात श्रीदत्त महाराज अदृश्य झाले. तिचे पती घरी आल्यावर तिने सर्व वृत्तांत पतीला सांगितला. तेव्हा ते पत्नीला म्हणाले की श्रीदत्त-स्वरूप महाराजांना भिक्षा घातल्याने माझे सर्व पितर तृप्त झाले आहेत.

या प्रसंगानंतर ती ब्राह्मण स्त्री प्रसूत होऊन तिला पुत्ररत्न झाले. तेथील ज्योतिषाने त्या बालकाचे वर्णन ज्ञानी, तपस्वी, दीक्षाकर्ता गुरू असे केले. मुलाचे नाव श्रीपाद असे ठेवले. सात वर्षांचा झाल्यावर त्याची मुंज केली. त्यावेळी तो बालक चारही वेद, मीमांसा इ. म्हणू लागला.

तो १६ वर्षापर्यंत सर्व ब्राह्मणांना वेदार्थ, धर्म आचार इ. शिकवत असे. १६ वर्षानंतर त्याच्या मातापित्यांनी त्याचा विवाह करण्याचे योजिले. पण पुत्राने पूर्ण नाकारले, उलट मला उत्तरेस तात्काळ तीर्थाचरणास जायचे आहे म्हणून परवानगी मागितली. माता – पित्याला भिक्षेच्या वेळेचे श्रीदत्त महाराजांचे बोल आठवले व त्यांना आपला हा पुत्र नसून अवतारी पुरूष आहे. तेव्हा त्यास आपण कसलीही आज्ञा देणे चुकीचे आहे हे जाणले.

पुत्रानेदेखील असे सांगितले की तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करीन व तात्काळ आपले वडील बंधु जे अक्षहीन व अपंग होते त्यांच्याकडे अमृतदृष्टीने पाहताच ते निरोगी व ज्ञानी झाले व त्यांना आशिर्वाद दिला संततीयुक्त, दीर्घायुषी, मातृ-पितृ सेवक व्हाल, इहलोकी परलोकी सुखी व्हाल. वेदशास्त्रात कीर्ती मिळवाल.

आपल्या आई-वडिलांना श्रीदत्त-स्वरूपात दर्शन देऊन त्यांनी पीठापूर (pithapuram) सोडले. हेच पीठापूर श्रीपाद-श्रीवल्लभ महाराजांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे व तेथे रोज श्रीदत्त-महाराज भिक्षेस येतात. तसेच पादगया हे ठिकाणही श्रीक्षेत्र पीठापूर येथे आहे. तेथील मंदिरासमोरच्या तीर्थ कुंडामध्ये गयासुराचे पाय आहेत अशी श्रद्धा आहे. या क्षेत्रामध्ये स्वत: भगवान शंकर कुक्कुटेश्वराच्या रुपामध्ये आहेत. हे एक शक्तीपीठ आहे.

भारतामध्ये अनेक शक्तीपीठं आहेत. त्यापैकी पिठापूर (pithapuram) हे जगातील अत्यंत शक्तीमान व महान असे पीठ आहे. कुठल्याही मानवाच्या जीवनाची दिशा बदलणारे असे हे एकमेव शक्तीपीठ आहे. हे गोदावरी जिह्यात आंध्र प्रदेशमध्ये सामालकोटाहून १२ कि.मी. दूर वसलेले एक अती लहानसे गाव आहे.

सन १३२० साली श्रीपादांचा जन्म भाद्रपद शु. चतुर्थी (गणेश चतुर्थी) च्या दिवशी कृष्णा यजुर्वेद शाखा, आपस्तंब सूत्र, भारद्वाज गोत्रोद्भव ब्रह्मश्री घंडिकोट अप्पल्लराजु शर्मा तथा अखंड सौभाग्य लक्ष्मी महाराणी सुमतीदेवी यांच्या पोटी झाला. साधारणत सन १९८३ साली पू. रामस्वामी यांनी एक लहानशी जागा खरेदी केली व सन १९८५ साली त्या जागेमध्ये एक औदुंबराचे रोपटे लावले.

तसेच सन १९८७ साली भक्तांच्या देणगीतून जागा खरेदी केली व त्या जागेवर सुंदर व डौलदार असे मंदीर म्हणजे महासंस्थानाची स्थापना केली व सन १९८८ साली २२ फेब्रुवारी रोजी श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मस्थानी म्हणजेच (श्री बापन्नार्युलुच्या घरी) श्री गणपती व श्रीपाद पादुकांची स्थापना श्री. पू. रामस्वामींच्या हस्ते झाली. तसेच श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ह्या अक्षर सत्य ग्रंथात श्रीपादांनी असे सांगितले आहे की जेथे माझा जन्म झाला त्याच जागी माझे पादुका मंदीर होणार व त्यांनी सांगितल्याप्रमाणे श्रीपादांच्या जन्मस्थळी श्रीपादांच्या पादुकांची स्थापना झाली.

या मंदिरात श्रीपाद श्रीवल्लभांची, श्री दत्तात्रेयांची व श्री नृसिंहसरस्वती यांच्या अप्रतिम व तेजस्वी अशा सुंदर मुर्ती आहेत. या मुर्तचीी स्थापना दिनांक ६/२/१९९२ ला झाली. तसेच मनमोहणारी व आकर्षणीय अशा काळ्या रंगाच्या श्रीपादांच्या पादुका आहेत व बाजुलाच औदुंबराचे झाड आहे. त्याच्या बाजुलाच श्री दत्तात्रेयांची काळ्या रंगाची मुर्ती व श्रींच्या पादुका आहेत.

तेथील दृश्य फार आनंदीदायक व शांतीदायक असे आहे. हे मंदीर पहाटे ५.०० वाजता उघडते व साधारणत सात वाजल्यापासून सर्व विधींची सुरूवात केली जाते. दुपारी साधारणत एक ते चारच्या दरम्यान जाळीच्या दाराने मंदीर बंद केले जाते. संध्याकाळी सात वाजल्यानंतर श्रीपादांच्या पालखीच्या तीन प्रदक्षिणा या मंदीराभोवती केल्या जातात. यावेळी सारे वातावरण अगदी प्रफुल्लीत व आनंदीदायक असते. यावेळी भक्तांमार्फत श्रीपादांची इतर भजने तसेच पवित्र व सुखदायक सिध्द मंगल गायली जातात.

या पालखी सोहळ्याचा आनंद उपभोगण्यासाठी व पालखी घेण्याचा लाभ भक्ताला मिळण्यासाठी त्या भक्ताने त्यावेळी स्वच्छ लुंगी व सोवळे नेसले पाहिजे. पालखी फुलांनी सजवलेली असते व पालखीत श्रीपाद श्रीवल्लभांची सुंदर चांदीची मुर्ती विराजमान असते. अतिशय सुंदर, दिव्य, मंगल वातावरण त्यावेळेस तेथे असते. आरती होऊन सर्व भक्तांना श्रीपादांच्या प्रसादाचे वाटप केले जाते. मंदीर लहान असल्यामुळे सध्यातरी राहण्याची व जेवण्याची सोय देवळाजवळच केली जाते. सधारणत रात्री ९.०० वाजता मंदीर बंद होते.


श्रीपादांच्या तीथीप्रमाणे इथे बरेच उत्सव केले जातात.  
१) श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी जयंती 
२) श्री दत्तजयंती 
३) श्री गुरूद्वादशी 
४) श्री कृष्णाष्टमी 
५) श्री पू. वासूदेवानंद सरस्वती जयंती 
६) गुरूपौर्णिमा. 


पिठापूर माहिती मराठी

श्री दत्तात्रेयांचे तीन अवतार एकाच ठिकाणी असलेले एकमेव महासंस्थान व आद्यपीठ म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान. येथे भक्तांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा केल्या जातात. त्यापैकी नित्यसेवा, पालखी सेवा, बिल्वार्चना, तुळशीपत्र व ब्राह्मण भोजन इत्यादी.

श्री कुकुटेश्वर मंदिर, पीठापूर (pithapuram)

पीठापुर (pithapuram) हे पूर्व काळापासूनच सिध्द क्षेत्र आहे. म्हणून या क्षेत्रास पादगया असे म्हणतात. आर्श्चयाची गोष्ट म्हणजे श्री कुक्कुटेश्वराच्या शिवलिंगामधून विद्युतकांती प्रकाशत होती व त्यावेळी त्यातून अप्पलराजु शर्मा व सुमती महाराणी यांच्या विवाहाची आकाशवाणी झाली. या स्थानामध्ये एक तलाव असून तेथे रोज हजारो भाविक स्नान करतात. तसेच मृत पावलेल्या व्यक्तीचे पूर्ण श्रध्दाभावक पिंडदान केल्यास त्या आत्म्यास मुक्ती मिळते. या जागेलाच पादगया असे संबोधले जाते.

तसेच श्रीपाद श्रीवल्लभ या चरित्रामध्ये अध्याय ६ पान क्र. ३८ येथे सांगितले आहे की, श्री अप्पलराजु शर्मा जेव्हा त्यांच्या घरातील कालाग्नीशमन दत्तात्रेयांची पूजा करीत असत व त्यानंतर त्या कालाग्नीशमन दत्तात्रेयांच्या लहान मुर्तीतून श्रीदत्तप्रभू मानवाच्या रूपात बाहेर येत व अप्पलराजुंच्या समोर बसून बोलत असत व श्रीदत्तप्रभु परत त्या लहान मुर्तीमध्ये विलीन होत असत.

श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृता मध्ये सांगितल्याप्रमाणे काही वर्षांनी पीठापूर (pithapuram) हे महाक्षेत्र होणार असून तेथे मुंग्याप्रमाणे माणसांची रांग लागेल व विक्रीसाठी तेथे थोडीसुध्दा जागा शिल्लक राहणार नाही. हे श्रीपादांचे वाक्य काळ्या दगडावर मारलेल्या रेघेप्रमाणे आहे.

तीर्थक्षेत्र पीठापूर

pithapuram

पुरातन काळात दक्ष प्रजापती राजाने यज्ञ आयोजित केला होता. त्या यज्ञात सर्व देवतांना (यक्ष गरूड, गंधर्व, किंपुरुषम, महर्षी, विष्णू, ब्रह्मदेव)आमंत्रित केले होते. भगवान शंकरांना या यज्ञा साठी आमंत्रण न दिल्यामुळे त्याची पत्नी सतीदेवी (दक्ष राजाची कन्या) या यज्ञानिमित आपल्या वडिलांना भेटण्यासाठी गेली होती. तेथे सतीदेवीने भगवान शंकरांना का निमंत्रण दिले नाही याची विचारणा केली असताना दक्षप्रजापतींने भगवानांची अवहेलना केली व त्यामुळे सतीदेवीला अतीव दुःख झाले.

त्यावेळी दक्ष यज्ञात सतीदेवी आमंत्रण नासताही गेली व सतीने योगग्निने देहत्याग केला. भगवान शंकराने तो देह खांद्यावर घेऊन पृथ्वीवर तांडव करू लागले. व  भगवान विष्णूनी सुदर्शन चक्राने त्या देहाचे खंड-खंड केले. सतीदेवीच्या शरीराचे भाग अन्य-अन्य ठिकाणी पडले त्यातील पाठीचा एक भाग पिठापुरला (pithapuram) पडल्यामुळे  त्या ठिकाणास ‘फुर हुत्तिका शक्ती पीठ’ असे म्हणतात. पूर्वीचे नाव पीठिकापूर व आता पिठापूर (pithapuram) असे आहे. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणतात “श्री पीठिकापूर माझे अत्यंत प्रिय स्थान आहे.

पीठिकापुरात मी जन्मलेल्या माझ्या मातेच्या गृहातच माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना होईल. माझा जन्म, कर्म हे अत्यंत दिव्य आहे. ते एक गोपनीय रहस्य आहे. तूं श्री पीठिकापुरातील माझ्या पादुका-प्रतिष्ठा स्थळापासून पाताळात जाऊन तेथील असलेल्या काल नागाची भेट घेऊन ये”.


स्थान माहात्म्य (pithapuram datta temple)

श्रीपादांची बहीण विद्याधारी, राधा व सुरेखा यांचा विवाह पिठापूर येथे झाला. त्रेतायुगात भारद्वाज ऋषींनी पिठापूरात सवित्रकाठकचयन यज्ञ केला. काशी निवासाचे फळ पिठापूर निवासामध्ये आहे. ज्याला पिठापूर निवासाची इच्छा आहे त्यालाच ही संधी मिळते.

पीठापुरला खास पौराणिक महत्त्व आहे. कुक्कुटेश्वर मंदिरासमोर १२१ Χ १२१ फूटाचा पक्का तलाव आहे. येथे पिंडदान केल्यास आत्म्यास मुक्ती मिळते. मंदिराचे आवारात मागील भागात चार हात, तीन शिरे असलेले आश्चर्यकारक स्वयंभू श्रीदत्त मंदिर आहे. तेथे एक महाशक्ती-पीठ आहे. हा परिसर ‘पुरुहुत्तिका’ म्हणून प्रसिद्ध आहे.

पीठापूर हे पूर्वकाळापासूनच सिद्धक्षेत्र आहे. गयासुराच्या शरीरावर देवतांनी यज्ञ केला. तेव्हा त्याचे मस्तक गयेला होते तर पाय पिठापूरला होते. म्हणून या क्षेत्रास पादगया असे म्हणतात. गयासुरास देवतांनी सांगितले होते की, सुर्योदय होईपर्यंत उठायचे नाही, मध्यरात्रीच भगवान शंकराने कुक्कुटाचे रूप घेऊन बांग दिली. गयासुर सकाळ झाली समजून उठला. भगवंतानी त्याचा उद्धार केला ते कुक्कुटेश्वर देवस्थान पिठापूरात आहे.

दक्ष यज्ञात सती देवीने योगाग्नीने आत्मदहन केले. भगवान शंकर तो देह घेऊन तांडव करू लागले. भगवान विष्णूने सुदर्शन चक्रानी त्यादेहाचे खंड खंड केले. ते भाग अन्य अन्य ठिकाणी पडले ते शक्तीपीठ झाले. प्रमुख अष्टादश शक्तीपिठातील पुरुहत्तिका हे शक्तीपीठ येथेच आहे.

याच परिसरात कालाग्नीशमन दत्तमंदिर आहे. काळ्या पाषाणातील दत्तमूर्ती अत्यंत तेजस्वी व जागृत भासते. हे दत्तमंदिर श्रीपाद श्रीवल्लभांच्या काळापासून असल्याचे सांगितले जाते. ह्या परिसरातील स्पंदने श्रीपाद श्रीवल्लभांच्या अस्तित्त्वाची ग्वाही देतात.

श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत अध्याय ३०मध्ये श्रीपादप्रभू म्हणतात, “शंकर भट्टा, भविष्यात माझे महासंस्थान श्री पीठीकापुरातील माझ्या जन्मस्थानीच निर्माण होईल. श्रीपीठीकापूर, श्यामलांबापूर आणि वायसपूर अग्रहार हे तिन्ही मिळून एक महानगर होईल. माझ्या देवस्थानचे दर्शन घेण्यास येणाऱ्या भक्तांची मुंग्याप्रमाणे रीघ लागेल.

कलियुगात अनेक आश्चर्ये घडतील. वशिष्ठ महामुनींचा अंश घेऊन जन्मास आलेला साधक श्रीपादश्रीवल्लभ संस्थानचा पूजारी नेमला जाईल. त्याच्याबरोबर मी किती दिव्य लीला करेन याचा अंतच नाही. क्षणोक्षणी दिव्यलीला आणि दिव्य विनोद हे चालतच राहतील.” पीठापूर आंध्रप्रदेशातील पूर्ण गोदावरी जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव भारतात ५१ शक्तीपिठापैकी मानले जाते.

तेथे श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थान आहे. येथील दत्तमंदिरात श्री दत्तगुरु व  श्रीनृसिंहसरस्वती यांच्या मूर्ती आहेत. श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुका आहेत. भारतात काशी येथे बिंदुमाधव प्रयाग व वेणीमाधव, रामेश्वर येथे सेतुमाधव, त्रिवेत्रम येथे सुंदरमाधव तर पिठापूरमध्ये कुंतीमाधव अशी माधवाची ५ मंदिरे आहेत. पांडवांची माता कुंती हीने माधवाची पूजा केली ते हे स्थान.

श्रीपाद श्रीवल्लभांचे निवासस्थान अत्यंत पवित्र व शांत आहे. येथे अभिषेक लघुरुद्र करुन आपणास सेवा अर्पण करता येते. सायंकाळी ७ वाजता पालखी सेवा असते. स्नान करुन सोवळे घालून आपणास पादूकांच्या पालखीत प्रत्यक्ष सहभागी होता येते. संस्थान तर्फे भोजन व चहाची मोफत व्यवस्था आहे. स्थान अत्यंत प्रसन्न व पवित्र आहे.

मंदिरातून सोडून जाताना डोळे अक्षरश: पाणावतात. व श्रीपादांना पुन्हा येण्याचे आश्र्वासन देऊनच भक्त या स्थानाचा निरोप घेतात.


स्थानाची वैशिष्ट्ये (pithapuram temple)

श्रीपाद श्रीवल्लभांनी सर्व बालपणाचा काळ येथेच व्यतीत केला.

कुक्कुटेश्वर कालाग्नीशमन दत्त, पादगया ही ठिकाणे येथील जागृत ठिकाणे आहेत.

श्रीपाद श्रीवल्लभांचे सर्व चमत्कार व लीला याचठिकाणी घडल्या.

श्रीपादश्रीवल्लभ येथेच औदुंबर वृक्षाखाली विश्रांती घेत असत.

त्यांच्याच आज्ञेनुसार पादुका व श्रींच्या मूर्तीची त्याच जागी स्थापना झाली.

श्रीपाद श्रीवल्लभांचे अभिवचन आहे की माझ्या इच्छेनच भक्त पिठापूरी येऊ शकतील,

पण जे येतील त्यांची सर्व कार्ये सिद्धीस जातील असे हे सिद्धस्थान.

चित्रा नक्षत्रात जे पूजा अर्चा व श्रीपाद चरितामृताचे पारायण करतील ते सर्व सिद्धी पावतील.

येथे आलेल्या सर्वांची बाधा पिडा निरसन होऊन ते सुखी होतात.

रक्षाबंधन दिवशी जे भक्त पिठापूरी वास्तव्य करुन श्रीपाद श्रीवल्लभांना आपल्या संकटातून रक्षणासाठी अर्चना करतील.

त्यांची सर्व जबाबदारी श्रीपाद श्रीवल्लभ घेतील


पिठापुर दर्शन (pithapuram temples)

 

तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 

पिठापूर माहिती मराठी – pithapuram temples – pithapuram temple history – pithapuram datta temple – pithapuram information in marathi – pithapuram temple

4 thoughts on “pithapuram – तीर्थक्षेत्र पीठापूर”

  1. सुभाष महिंद्रकर

    सुंदर माहिती,,,, माझा मित्र मांगेलकर सोबत मी जाऊन आलो,,,, आम्हाला योगायोग,,, मंदिराच्या जवळच असणार्‍या निवासस्थानात जागा मिळाली, जवळपासच्या सर्व मंदिरांना रिक्षातून भेट दिली, सत्यनारायण मंदिर इत्यादी पाहून घेतले,, एक अविस्मरणीय पिठापूर यात्रा,,, संपन्न केली,,,,,

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *