संत तुकाराम अभंग

वाटे या जनाचें थोर बा – संत तुकाराम अभंग – 1002

वाटे या जनाचें थोर बा – संत तुकाराम अभंग – 1002


वाटे या जनाचें थोर बा आश्चर्य । न करिती विचार कां हिताचा ॥१॥
कोण दम ऐसा आहे यांचे पोटीं । येईल शेवटीं कोण कामा ॥ध्रु.॥
काय मानुनियां राहिले निंश्चिती । काय जाब देती यमदूतां ॥२॥
कां हीं विसरलीं मरण बापुडीं । काय यांसी गोडी लागलीसे ॥३॥
काय हातीं नाहीं करील तयासी । काय जालें यांसी काय जाणों ॥४॥
कां हीं नाठविती देवकीनंदना । सुटाया बंधनापासूनियां ॥५॥
काय मोल यासी लागे धन वित्त । कां हें यांचें चित्त घेत नाहीं ॥६॥
तुका म्हणे कां हीं भोगितील खाणी । कां त्या चक्रपाणी विसरती ॥७॥

अर्थ

मला या लोकांचे फार आश्चर्य वाटते कारण हे लोक स्वतःच्या हिताचा विचार का बरे करत नाही? त्यांच्या अंतःकरणामध्ये असा कोणता विश्वास आहे? हे लोक नेमके कोणाच्या आधारावर ऐवढे निश्चिन्त राहिले आहेत शेवटी हे लोक आपल्या पापाचा जाब यामदुता पुढे कसा देणार ?हे लोक आपन मरनार आहोत हे विसरले की काय आणि यांना या भाव सागरामध्ये अशी कोणती गोडी लागली ?आहो यांच्या हातामध्ये नेमके काय नाही काय म्हंटले तर हे लोक करणार नाही परन्तु यांना काय झाले आहे हे हे काही कळत नाही. ह्या संसारबंधनातून सोडण्याकरता हे लोक देवकीनंदन श्रीकृष्णाचे चिंतन का करत नाहीत त्याला का आठवत नाहीत. हरिचिंतन करण्याकरता कोणत्याही प्रकारचे मोल लागत नाही हे या लोकांच्या चित्तात कां बरे येत नाही हे चित्ता हे लोक का बरे घेत नाहीत?तुकाराम महाराज म्हणतात अरे तुम्ही या कृष्णाचे चिंतन केले नाही तर पुढे नरकयातना भोगाव्या लागतील हे मात्र निश्चित मग हे लोक त्याचक्र्पानी कृष्णाला श्रीकृष्णाला विसरले आहेत कि काय?


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

वाटे या जनाचें थोर बा – संत तुकाराम अभंग – 1002

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *