संत तुकाराम अभंग

तान्हे तान्ह प्याली – संत तुकाराम अभंग – 1033

तान्हे तान्ह प्याली – संत तुकाराम अभंग – 1033


तान्हे तान्ह प्याली । भूक भुकेने खादली ॥१॥
जेथें तें च नाहीं जालें । झाडा घेतला विठ्ठलें ॥ध्रु.॥
वास वासनेसी नाहीं । मन पांगुळलें पायीं ॥२॥
शेष उरला तुका । जीवीं जीवा जाला चुका ॥३॥

अर्थ

या विठ्ठलाच्या कृपेने मला असे झाले की तहानेनेच तहान प्यावून घ्यावी आणि भूकेनेच भूक खावी. तहान व भूक ज्या जीवाचे धर्म आहेत तो जीवच आता जीवत्वदशेने नाहीसा झाला आहे व या सर्वांचा झाडा या विठ्ठलाने केला आहे. आता वासनेला आश्रयच राहीला नाही कारण ज्या मनात वासना राहाते ते मनच आता हरीच्या चरणाच्या ठिकाणी पांगुळले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “आता माझ्या जीवाचा जीवदशेचा बाद झाला असून मी आता कुठस्थ ब्रम्हरुपाने उरलो आहे.”


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

तान्हे तान्ह प्याली – संत तुकाराम अभंग – 1033

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *