सार्थ तुकाराम गाथा

नमस्कारी भूतें विसरोनि याती – संत तुकाराम अभंग – 1082

नमस्कारी भूतें विसरोनि याती – संत तुकाराम अभंग – 1082


नमस्कारी भूतें विसरोनि याती । तेणें आत्मिस्थती जाणीतली ॥१॥
परउपकारीं वेचियेल्या शक्ती । तेणें आत्मिस्थती जाणीतली ॥ध्रु.॥
द्वैतांद्वैतभाव नाहीं जया चित्तीं । तेणें आत्मिस्थती जाणीतली ॥२॥
जयाचिये वाचे नये निंदास्तुती । तेणें आत्मिस्थती जाणीतली ॥३॥
उचित अनुचित जाणे धर्मनीती । दृढ भाव भक्ती मानव तो ॥४॥
तुकयाबंधु म्हणे वरकड ते येर । संसाराचे खर भारवाही ॥५॥

अर्थ

आपली जात विसरून जो सर्व प्राणिमात्रांना नमस्कार करतो त्यांनीच आपली आत्मस्थिती जाणली असे समजावे. जो परोपकार करण्यासाठी आपली शक्ती पणाला लावतो त्यानेच आपली आत्मस्थिती जाणली आहे असे समजावे. ज्याच्या चित्ता मध्ये द्वैत आणि अद्वैत हा भावच नाही त्याने आपली आत्मस्थिती झाली आहे .ज्याच्या वाणीमध्ये कोणाविषयी ही निंदा किंवा स्तुती येत नाही त्याने आपली आत्मस्थिती जाणली आहे. ज्याला उचित व अनुचित धर्मनीती समजते आणि देवाविषयी भक्तिभाव ज्याच्या चित्ता मध्ये आहे त्याने मानव जन्माला येऊन आपल्या जन्माचे सार्थक केले असे समजावे. तुकया बंधू कान्होबा म्हणतात या व्यतीरिक्त जर कोणी वागत असेल तर तो व्यक्ती संसाराचा भार वाहणारा गाढवच आहे असे समजावे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

नमस्कारी भूतें विसरोनि याती – संत तुकाराम अभंग – 1082

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *