सार्थ तुकाराम गाथा

थोर ते गळाली पाहिजे – संत तुकाराम अभंग – 1124

थोर ते गळाली पाहिजे – संत तुकाराम अभंग – 1124


थोर ते गळाली पाहिजे अहंता । उपदेश घेतां सुख वाटे ॥१॥
व्यर्थ भरोवरी केलें पाठांतर । जोंवरी अंतर शुद्ध नाहीं ॥ध्रु.॥
घोडें काय थोडें वागवितें ओझें । भावेंविण तैसें पाठांतर ॥२॥
तुका म्हणे धरा निष्ठावंत भाव । जरी पंढरीराव पाहिजे तो॥३॥

अर्थ

गुरुचा उपदेश घेताना तुला सुख वाटते परंतु तुला देहाभिमान बाजूला सारता आला पाहिजे .भरपूर ओव्यांचे व वेदांचे पाठांतर तु केले पण जोपर्यंत अंतकरण शुद्ध होत नाही तोपर्यंत हे सर्व व्यर्थ ठरते .घोड्याच्या पाठीवर खूप ओझे असते पण त्याला त्याचा काही लाभ नसतो अगदी तसेच तू कितीही वेद अभ्यास केला व त्याचे पठण केले पण जर तुझे अंतकरण शुद्ध झाले नाही तर ते सर्व व्यर्थ ठरेल अंतकरणात जर भक्तिभाव नसेल तर काहीच उपयोग होणार नाही केवळ पाठांतराचे ओझे तुझ्या माथ्यावर आहे असे समजावे .तुकाराम महाराज म्हणतात की तुला जर पंढरीनाथाची प्राप्ती व्हावी असे जर वाटत असेल तर तू अंतःकरणा मध्ये निष्ठावंत भक्ती प्रेम धारण कर.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

थोर ते गळाली पाहिजे – संत तुकाराम अभंग – 1124

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *