सार्थ तुकाराम गाथा

बहु टाळाटाळी – संत तुकाराम अभंग – 1127

बहु टाळाटाळी – संत तुकाराम अभंग – 1127


बहु टाळाटाळी । होते भोवताहे कळी ॥१॥
बरें नव्हेल सेवटीं । भय असों द्यावें पोटीं ॥ध्रु.॥
मुरगाळीता कान । घुसमाडील सावधान ॥२॥
अबोलणा तुका । ऐसें कोणी लेखूं नका ॥३॥

अर्थ

मनुष्य जीवनामध्ये परमार्थाची टाळाटाळ होते त्याला कारण म्हणजे कळी काळच आहे. पण याचे परिणाम चांगले होणार नाहीये. याचे भय मनुष्याने आपल्या मनात ठेवायला पाहिजे .पण काळ ज्या वेळेस अशा माणसांचा कान मुरगळून त्यांना नरकात घुसडेल तेव्हाच ते सावध होतील. तुकाराम महाराज म्हणतात लोक हो मी अबोलका आहे असे कोणीही समजून घेऊ नका, असे जर कोणी वाईट वागतांना दिसेल ,परमार्थाची उपेक्षा कोणी करताना दिसेल तर मी त्याला बोलल्या शिवाय राहणार नाही.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

बहु टाळाटाळी – संत तुकाराम अभंग – 1127

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *