सार्थ तुकाराम गाथा

अंतरींचें गोड – संत तुकाराम अभंग – 1144

अंतरींचें गोड – संत तुकाराम अभंग – 1144


अंतरींचें गोड । राहें आवडीचें कोड ॥१॥
संघटणें येती अंगा । गुणदोष मनभंगा ॥ध्रु.॥
उचिताच्या कळा । नाहीं कळत सकळा ॥२॥
तुका म्हणे अभावना । भावीं मूळ तें पतना॥३॥

अर्थ

ज्या माणसांचे अंतकरण गोड असते, प्रसन्न असते त्यांच्या आवडीची इच्छापुर्ती होते. जर लोकांशी संघटन ठेवले तर आपल्या अंगांमध्ये विविध प्रकारचे गुण दोष उत्पन्न होतात व मनोभंग होतो. त्यामुळे कोणाशीही संघटन करू नये .बऱ्याच लोकांना उचित काय अनुचित काय हे कळतच नाही .तुकाराम महाराज म्हणतात जर आपण अंधश्रद्धा वान व्यक्तींचे संघटन केले तर देव, संत आणि वेद यांच्या ठिकाणी आपली अभावना उत्पन्न होते आणि तेच आपल्या नाशाचे मूळ कारण होते.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

अंतरींचें गोड – संत तुकाराम अभंग – 1144

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *