सार्थ तुकाराम गाथा

हरी म्हणतां गति- संत तुकाराम अभंग – 1179

हरी म्हणतां गति- संत तुकाराम अभंग – 1179


हरी म्हणतां गति पातकें नासती । कळिकाळ कांपती हरी म्हणतां ॥१॥
हरी म्हणतां भुक्ती हरी म्हणतां मुक्ती । चुके यातायाती हरी म्हणतां ॥ध्रु.॥
तपें अनुष्ठानें न लगती साधनें । तुटती बंधनें हरी म्हणतां ॥२॥
तुका म्हणे भावें जपा हरीचें नाम । मग काळयम शरण तुह्मा ॥३॥

अर्थ

हरीचे नाम घेतल्याने सर्व पापाचे नाश होतात. आणि सद्गती प्राप्त होते आणि कळिकाळ देखील हरिनाम घेतल्यावर थरथर कापतो .हरी म्हटल्यानंतर भुक्ती मुक्ती प्राप्त होते आणि जन्म मरण रुपी येरझार नाहीसे होतात संपतात. हरिनाम घेतल्यानंतर संसार बंधने तुटतात आणि तप ,अनुष्ठान असे इतर कोणतेही साधन करण्याची गरज लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात भक्ती भावपूर्वक हरिनाम घेतल्यानंतर काळात देखील तुम्हाला शरण येणार.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

हरी म्हणतां गति- संत तुकाराम अभंग – 1179

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *