सार्थ तुकाराम गाथा

भय हरीजनीं – संत तुकाराम अभंग –1204

भय हरीजनीं – संत तुकाराम अभंग –1204


भय हरीजनीं । कांहीं न धरावें मनीं ॥१॥
नारायण ऐसा सखा । काय जगाचा हा लेखा ॥ध्रु.॥
चित्त वित्त हेवा । समर्पून राहा देवा ॥२॥
तुका म्हणे मन । असों द्यावें समाधान ॥३॥

अर्थ

हरी भक्तांनी हरी भजन करण्याविषयी कोणत्याही प्रकारचे मनामध्ये भय धरू नये, कारण नारायणा सारखा बलाढ्य सखा सोबत असताना जगाला भिण्याचे कारण काय येते ?त्याकरिता आपले चित्त वित्त देवाला समर्पण करून रहा. तुकाराम महाराज म्हणतात आणि आपले मन समाधानी सुखी असू द्यावे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

भय हरीजनीं – संत तुकाराम अभंग –1204

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *