सार्थ तुकाराम गाथा

जप तप ध्यान न – संत तुकाराम अभंग –1239

जप तप ध्यान न – संत तुकाराम अभंग –1239


जप तप ध्यान न लगे धारणा । विठ्ठल कीर्त्तनामाजी उभा ॥१॥
राहें माझ्या मना दृढ या वचनीं । आणिक तें मनीं न धरावें ॥ध्रु.॥
कीर्तनसमाधि साधन ते मुद्रा । राहतील थारा धरोनियां ॥२॥
तुका म्हणे मुक्ती हरीदासांच्या घरीं । वोळगती चारी ॠद्धीसिद्धि ॥३॥

अर्थ

विठ्ठलाची प्राप्ती करण्याकरिता कोणत्याही प्रकारची जप,तप ,ध्यान,धारणा करण्याची गरज नाही. कारण विठ्ठलाची प्राप्ती हरिकीर्तनाने होते, हरी कीर्तनात तो नेहमी उभा असतो. माझ्या मनामध्ये असा दृढ विश्वास आहे की विठ्ठल कीर्तनात उभा राहतो .त्यामुळे विठ्ठलाच्या प्राप्तीकरता हरिकीर्तन शिवाय इतर कोणतेही साधन करू नये व मनातदेखील आणू नये. कीर्तनामध्ये समाधी ,ध्यान ,मुद्रा ही साधने आश्रय धरून असतात. तुकाराम महाराज म्हणतात हरी भक्तांच्या घरी चारही मुक्ती व रिद्धी सिद्धी चाकरी करत असतात.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

जप तप ध्यान न – संत तुकाराम अभंग –1239

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *