सार्थ तुकाराम गाथा

जन हें सुखाचें दिल्याघेतल्याचें – संत तुकाराम अभंग –1276

जन हें सुखाचें दिल्याघेतल्याचें – संत तुकाराम अभंग –1276


जन हें सुखाचें दिल्याघेतल्याचें । अंत हें काळींचें नाहीं कोणी ॥१॥
जाल्या हीन शक्ती नाकडोळे गळती । सांडोनि पळती रांडापोरें ॥ध्रु.॥
बाइल म्हणे खर मरता तरी बरें । नासिलें हें घर थुंकोनियां ॥२॥
तुका म्हणे माझीं नव्हतील कोणी । तुज चक्रपाणी वांचूनियां ॥३॥

अर्थ

सर्व लोक सुखाचे सोबती आहेत आणि यांच्याशी देणे-घेणे केले तरच ते उपयोगी पडतात आणि यांच्याशी देणे-घेणे केले नाही तर यांना आपला काहीच उपयोग होत नाही. अंतकाळी कोणीही कोणाचे नाही. अरे तुझी शक्ति हीन झाली, तू म्हातारा झाला की तुझे नाक आणि डोळे गळायला लागतील त्या वेळी बायको आणि पोरे तुला सोडून पडतील. तुझी बायको ज्यावेळी तू घरात थुंकशील त्यावेळी म्हणेल खरेतर हा म्हातारा मेलेला बरा याने जागोजागी थुंकून माझे घर खराब केले. तुकाराम महाराज म्हणतात हे चक्रपाणी तुझ्या वाचून माझे कोणीच नाही.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

जन हें सुखाचें दिल्याघेतल्याचें – संत तुकाराम अभंग –1276

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *