सार्थ तुकाराम गाथा

जन्मा आलीयाचा लाभ – संत तुकाराम अभंग –1350

जन्मा आलीयाचा लाभ – संत तुकाराम अभंग –1350


जन्मा आलीयाचा लाभ । पद्मनाभ दरुषणें ॥१॥
म्हणउनि लवलाहे । पाय आहे चिंतीत ॥ध्रु.॥
पाठीलागा येतो काळ । तूं कृपाळु माउली ॥२॥
बहु उसंतीत आलो । तया भ्यालो स्थळासी ॥३॥
कोण्या उपाये हे घडे । भव आंगडे सुटकेचे ॥४॥
तुका म्हणे तूं जननी । ये निर्वाणी विठ्ठले ॥५॥

अर्थ

मनुष्य जन्माला आल्याचा लाभ कोणता असेल तर पद्मनाभा चे दर्शन होणे हाच. म्हणून मी पद्मनाभा च्या पायाचे चिंतन करीत आहे. हा काळ पाठीमागे लागला आहे पण तु माझी कृपाळू माऊली आहेस त्यामुळे तुला माझी सर्व चिंता आहे. मी खूप वेळाने येथे आलो आहे. मी या यमलोकीच्या स्थळा लाभलो आहे. या भवसागरातून माझी सुटका केव्हा होईल हे काही मला कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे विठ्ठला तू माझी जननी आहेस, आई आहेस त्यामुळे मला या दुःखातून सोडवण्यास लवकर ये, धावत ये.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

जन्मा आलीयाचा लाभ – संत तुकाराम अभंग –1350

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *