सार्थ तुकाराम गाथा

केला कइवाड संतांच्या – संत तुकाराम अभंग –1359

केला कइवाड संतांच्या – संत तुकाराम अभंग –1359


केला कइवाड संतांच्या आधारें । अनुभवें खरें कळों आलें ॥१॥
काय जीवित्वाची धरुनियां आशा । व्हावें गर्भवासा पात्र भेणें ॥ध्रु.॥
अबाळीनें जावें निश्चिंतीच्या ठायां । रांडा रोटा वांयां करूं नये ॥२॥
तुका म्हणे बळी देतां तें निधान । भिकेसाठी कोण राज्य देतो ॥३॥

अर्थ

मी भक्ती करण्याचा निर्धार केला आहे तो केवळ संतांच्या आधाराने कारण संतांना जो अनुभव आला आहे तोच अनुभव मला आला आहे. आता मी जीवित्वाची इच्छा कशासाठी धरू आणि तशी इच्छा मी धरलीच तर मी गर्भवास भाग घेण्यास पात्र आहे. भक्ती करताना कितीही मान-अपमान झाला तरीही भक्ती करावी व निश्चित अशा ठिकाणी जावे. नाहीतर उगीचच रांडा सारखे पोट भरून जीवन जगण्याची अपेक्षाच करू नये. तुकाराम महाराज म्हणतात जर मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल तर देवाच्या पायावर आपला जीव बळी द्यावा लागतो भीक मागून कोणी राज्य देते का तर नाही युद्ध करूनच राज्य मिळावे लागते.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

केला कइवाड संतांच्या – संत तुकाराम अभंग –1359

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *