सार्थ तुकाराम गाथा

ज्याने आड यावें कांहीं – संत तुकाराम अभंग –1364

ज्याने आड यावें कांहीं – संत तुकाराम अभंग –1364


ज्याने आड यावें कांहीं । त्याचें नाहीं बळ आतां ॥१॥
मन येथें साह्य जालें । हरीच्या धालें गुणवादीं ॥ध्रु.॥
चुकुर तो गेला काळ । जालें बळ संगाचें ॥२॥
तुका म्हणे धरूं सत्ता । होईल आतां करूं तें ॥३॥

अर्थ

जे विकार परमार्थाला आड येत होते आता त्यांचे बळ नाहीशे झाले आहे. कारण मनच मला परमार्थ करण्यासाठी सहाय्य करत आहे व हरिनामाच्या गुणानुवादाने ते तृप्त झाले आहे. मनाने आता परमार्था विषय चुकारपणा करणारा काळा गेला आहे कारण संतांचे संगती नेत्याला बळ प्राप्त झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या हाती सत्ता आली आहे आता आम्ही करू तेच होईल.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

ज्याने आड यावें कांहीं – संत तुकाराम अभंग –1364

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *