सार्थ तुकाराम गाथा

नभोमय जालें जळ – संत तुकाराम अभंग –1376

नभोमय जालें जळ – संत तुकाराम अभंग –1376


नभोमय जालें जळ । एकीं सकळ हरपलें ॥१॥
आतां काय सारासारी । त्याच्या लहरी तयात ॥ध्रु.॥
कैचा तेथ यावा सांडी । आप कोंडी आपणा ॥२॥
तुका म्हणे कल्प जाला । अस्त गेला उदय ॥३॥

अर्थ

महाप्रलय झाला की सर्व आकाश जलमय दिसते पृथ्वी सकट पृथ्वीवरील सर्व जलाशयच होते. जिकडेतिकडे पाणीच असते आता यापुढे कोणत्याही पाण्याच्या हालचाली होतील काय? पाण्याच्या लाटा त्याच्या पोटात मिसळणार तिथे नद्या ओढे याचे पाणी कसे मिसळणार कारण सर्व पाणी एक झालेले असते आणि पाण्याने आपण होऊन आपल्यालाच कोंडून टाकलेले असते. तुकाराम महाराज म्हणतात एकदा की कल्पांत झाला की चंद्र सूर्य यांचा उदय अस्त देखील नाहीसा होतो तात्पर्य एकदा की आत्मज्ञान झाले की सर्व भेद हरवून जातात.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

कोणापाशीं द्यावें माप – संत तुकाराम अभंग –1375

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *