सार्थ तुकाराम गाथा

आहाच तो मोड वाळलियामधीं – संत तुकाराम अभंग –1381

आहाच तो मोड वाळलियामधीं – संत तुकाराम अभंग –1381


आहाच तो मोड वाळलियामधीं । अधीराची बुद्धि तेणें न्यायें ॥१॥
म्हणऊनि संग न करीं दुसरें । चित्त मळीन द्वारें दोड पडे ॥ध्रु.॥
विषासाठी सर्पा भयाभीत लोक । हें तों सकळीक जाणतसां ॥२॥
तुका म्हणे काचें राहे कुळांकुड । अवगुण तो नाड ज्याचा तया ॥३॥

अर्थ

उगवलेले मोड जसे पाण्यावाचून वाळून गेल्यावर व्यर्थ ठरते त्या न्यायाने ज्याच्या अंगी धीर नाही त्याची बुद्धी व्यर्थ ठरते. म्हणून त्यामुळे इतर कोणाची संगतीन न करता संतांचे संगती करावी. जर आपण दुष्टांची संगती केली तर आपले चित्त मलीन होते. सर्पाच्या पोटी विष असते त्यामुळे सर्व लोक त्याला घाबरतात ही गोष्ट तर सर्वच लोक जाणतात. तुकाराम महाराज म्हणतात जे कच्चे लाकूड आहे ते कामी येत नाही म्हणजेच ज्याचा त्याचा अवगुन ज्याला त्याला बाधक ठरतो.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

आहाच तो मोड वाळलियामधीं – संत तुकाराम अभंग –1381

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *